
“मुंबईत दरवर्षी मान्सूनमध्ये सरासरी 800 झाडं कोसळतात. पण काल एकाच दिवसात 350 झाडं पडली. आजचा दिवस त्यापेक्षाही गंभीर आहे. म्हणून वर्क फ्रॉम होमची विनंती केली. दुपारनंतर ताशी 70 ते 90 किलोमीटर वेगाने वार वाहणार आहेत” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. “आज दुपारनंतर खूप मोठ्या प्रमाणात वारं असणार आहे. त्याचा झाडांवर परिणाम होऊ शकतो. त्या दृष्टीने लोकांनी सजग राहणं आवश्यक आहे. लोकांनी सावध रहावं. शक्यतो प्रवास टाळावा. अत्यंत गरजेचं असल्याशिवाय प्रवास करु नये. युवा वर्गाला विशेष आवाहन आहे, आजचं वारं बघता त्यांनी टूरिजम टाळावं” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केलं.
(बातमी अपडेट होत आहे)
Leave a Reply