
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडमधील एका गावात लक्ष्मीनारायण मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांनी तेथील स्थानिकांना संबोधित केले. लक्ष्मीनारायणा मंदिराचे माहात्म्य सांगत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. दरम्यान, त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या एका वक्तव्याची सर्वत्र चर्चा आहे.
या कार्यक्रमादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री असतानाच्या अडीच वर्षांच्या काळात केलेल्या कामांविषयी सांगितले. यावेळी ते म्हणाले की या कालावधीत आम्ही ५६७ निर्णय घेतले. त्यानंतर त्यांनी लाडकी बहीण योजना ही अनेक बहिणींचा आधार आहे, असे सांगितले. दरम्यान, त्यांनी ‘कोणी मायका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही’ असे विधान केले.
Leave a Reply