• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Bhuvneshwar Kumar: मला पश्चाताप होतोय की…टीम इंडियातील कमबॅकवर भुवनेश्वर कुमारचं खोचक विधान, बीसीसीआयला सुनावलं

August 3, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संघ सध्या नवनवीन खेळाडूंना संधी देत आहे, संघात सातत्याने अनेक बदल होताना दिसत आहे. संघ प्रत्येक मालिकेत नवनवीन खेळाडूंना संधी देऊन संघाचे नियोजन कसे चांगले होईल याकडे लक्ष देत आहे. अशात जे खेळाडू बऱ्याच काळापासून संघाबाहेर आहेत त्या खेळाडूंना पुन्हा संघात संधी मिळेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संघात काही गोलंदाजांचा कमबॅक व्हावा अशी आशा सर्वांनाच आहे.  अशीच एक मागणी खूप जोर धरत होती की भुवनेश्वर कुमारची संघात पुन्हा एकदा एन्ट्री घेईल, बीसीसीआय भुवनेश्वरला एक संधी पुन्ही देईल अशी चर्चा रंगलेली असताना आता भुवनेश्वर कुमारनेच यावर आपले मौन सोडले आहे.

भारतीय क्रिकेट संघातून बऱ्याच काळापासून बाहेर असलेल्या वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने आता मौन सोडले आहे. भुवनेश्वर म्हणाला की, “आता भारतीय संघात परतण्याची किंवा न येण्याची पर्वा नाही. मी आता केवळ आवडीपोटी खेळत आहे. ” भुवनेश्वर 2022 पासून भारतीय संघाबाहेर आहे.  तो देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला सलग दोन आयपीएल विजेतेपद मिळवून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.

🗣 Bhuvi: “𝙀𝙫𝙚𝙣 𝙄 𝙘𝙤𝙪𝙡𝙙𝙣’𝙩 𝙗𝙚𝙡𝙞𝙚𝙫𝙚 𝙩𝙝𝙖𝙩” 😮‍💨

Bhuvi looks back at that unforgettable finish against MI, the range-hitting sessions he had with DK that gave him the belief to go big, handling pressure in crunch moments, and why the team will always come… pic.twitter.com/KJhWGQDCFo

— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) August 2, 2026

रविवारी आरसीबी पॉडकास्टवर बोलताना, भुवनेश्वर कुमार टीम इंडियामध्ये परतण्याबद्दल म्हणाला, “मी भारतासाठी खेळलो आहे. ही काही मिळवण्याची गोष्ट नाही. जर मला पुन्हा संधी मिळाली, तर ते उत्तमच आहे, मी सध्या जे काही करत आहे, ते खेळावरील प्रेमापोटी करत आहे. मला माहित आहे की मला शिस्तबद्ध राहावे लागेल. मी देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. मी यूपी टी-20 लीग खेळत आहे. मला खात्री करायची आहे की मी क्रिकेटच्या सतत संपर्कात राहीन आणि त्याचबरोबर स्वतःला सावरण्यासाठी आवश्यक विश्रांतीही देईन.” भुवनेश्वरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटव्यतिरिक्त आपल्या आयुष्यात पुढे जाण्यास मदत केल्याबद्दल आपल्या कुटुंबाचे आभार मानले.

“मी शांत राहतो. माझा स्वभावच तसा आहे. आणि याचं श्रेय मी माझ्या कुटुंबाला देतो,  आम्ही घरी असताना कधीच क्रिकेटबद्दल बोलत नाही. मी भारतीय संघात कॅमबॅक करणार की नाही, माझं सिलेक्शन का झालं नाही किंवा माझं काय चुकलं? याबद्दल आम्ही घरी कधीच चर्चा करत नाही. आमच्या याच कृतीमुळे मला आता कसलाच पश्चाताप होत नाही. जेव्हा तुम्ही टीममध्ये खेळत असता तेव्हा तुम्हाला वाटतं की टीम सर्वात आधी असायला हवी, पण जेव्हा तुम्ही टीममधून बाहेर असता तेव्हा वाटतं की, यार मी टीममध्ये का नाहीये?, असंही भूवी म्हणाला.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मनोज जरांगेंचा मोठा विजय? सरकारने थेट दिला शब्द, येत्या दोन-तीन दिवसांत… विखे पाटलांनी सांगून टाकलं!
  • Brahmastra 2 Update : रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये ‘सैयारा’ स्टारची एंट्री ! कधी सुरू होणार शूटिंग ?
  • महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दिलासा: शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, CM Fadnavis यांची प्रतिक्रिया
  • हट्टीपणामुळे या अभिनेत्रीला वडिलांनी काढलेले घराबाहेर, आईचे आडनाव वापरून बनली प्रसिद्ध अभिनेत्री, कोण आहे ती?
  • Indian Railway : रेल्वेचा मोठा निर्णय, वेंटिग लिस्टची झंझट संपणार, पाहा नेमके काय होणार ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in