
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांनी आपल्या नव्या परराष्ट्र धोरणाची घोषणा केली आहे. यामध्ये ‘नेपाळ सर्वात आधी’ या सिद्धांताला प्राथमिकता देण्यात आली आहे. नेपाळचं नवं परराष्ट्र धोरण हे पूर्वीच्या सरकारच्या तुलनेमध्ये खूप वेगळं आहे. नव्या परराष्ट्र धोरणामध्ये नेपाळच्या सार्वभौमत्वासोबतच नेपाळच्या आर्थिक विकासावर भर देण्यात आला आहे. सोबतच आम्ही आमच्या शेजारील देशांसोबत समानतेचा संबंध ठेवू असंही बालेन शाह यांनी म्हटलं आहे. नेपाळच्या नव्या परराष्ट्र धोरणाचं प्रमुख वैशिष्ट म्हणजे नेपाळचं रूपांतर आता बफर स्टेटमधून एका ब्रीजमध्ये होणार आहे. असा पूल जो आर्थिक विकासाच्या आघाडीवर सर्वांशी जोडला जाईल. एवढंच नाही तर आम्ही कोणत्याही लष्करी आघाडीमध्ये सहभागी होणार नाही, अशी घोषणाही यावेळी शाह यांनी केली आहे.
नेपाळकडून आपल्या नव्या परराष्ट्र धोरणाची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामध्ये म्हटलं आहे की, आम्ही आमच्या सार्वभौमत्वासोबतच भौगोलिक अंखडता आणि राष्ट्रीय हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊ, सध्या जगभरात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत, त्याचा उपयोग आम्ही नेपाळच्या आर्थिक विकासासाठी करून घेऊ, नेपाळचा विकास हाच आमच्यासाठी सर्वोच्च असल्याचं नव्या परराष्ट्र धोरणामध्ये म्हटलं आहे.
आपल्या नव्या परराष्ट्र धोरणात नेपाळने चीन आणि भारताबाबत देखील मोठी घोषणा केली आहे. नेपाळला एक ‘बफर स्टेट’ मध्यस्थ राष्ट्राच्या भूमिकेतून बाहेर काढून त्याचं रुपातंर आम्ही अशा ब्रीजमध्ये करू जो ब्रीज भारत आणि चीनला समान पद्धतीने जोडला जाईल. नव्या परराष्ट्र धोरणानुसार आम्ही एक स्वतंत्र, तटस्थ व अलिप्त राष्ट्र म्हणून नेपाळला जागतिक स्तरावर ओळख मिळून देऊ असं बालेन शाह यांनी म्हटलं आहे. आमचं चीन आणि भारतासोबत एक स्वतंत्र असं परराष्ट्र धोरण असेल. शेजारील सर्व देशांसोबत समान जवळीक आणि योग्य ते अंतर ठेवणारं आमचं परराष्ट्र धोरण असेल असंही बालेनशाह यांनी म्हटलं आहे. सध्या नेपाळच्या या नव्या परराष्ट्र धोरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.
Leave a Reply