
ज्याच्या राजकीय वर्तुळात विधान परिषदेच्या जागांबाबत चर्चांना जोर आला असताना प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांची निवड महत्त्वाची मानली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना संधी दिल्याने राजकीय समीकरणांना नवं वळण मिळालं आहे.
बेलोरा गावात बच्चू कडू यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद व्यक्त केला. कोणतंही आंदोलन किंवा निवडणूक असो, बच्चू कडू प्रत्येक महत्त्वाच्या कामाची सुरुवात आई इंदीराबाई कडू यांच्या समाधीस्थळावर नतमस्तक होऊन करतात.
यावेळी त्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर मेहनत घेणार असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, ‘शिवसेना वाढवण्यासाठी ताकतीने महाराष्ट्रभर पायाला भिंगरी लावून फिरू’ आई-वडिलांच्या संस्कारातून प्रेरणा घेऊन विकासकामांना गती देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
Leave a Reply