Khawadya Dongar : कुणाल चांदगुडे आणि त्याचे आई वडील एकाच घरात राहत होते. अशात तिघांच्या निधनानंतर त्याचा पाळीव कुत्रा एकटाच पडला. त्यांच्या कुत्र्याचं नाव शेरु असं आहे. ज्या माणसांसोबत दिवस रात्र शेरु खेळत होता, आनंदी जगत होता, तेच तीन जण 21 ऑगस्ट पासून दिसत नसल्याने तो सतत भुंकत होता. कुणाल याच्या शेजारी राहणाऱ्यांनी देखील सांगितलं […]
अखेर मुहूर्त ठरला? राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मोठी अपडेट, कोअर कमिटीच्या घडामोडींना वेग
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्याला अचानक ब्रेक लागला. तर आता नवीन अपडेट समोर आली आहे. या महिन्याच्या अखेरीस ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कोअर कमिटीची बैठक बोलवली आहे. या बैठकीत दोन्ही पक्ष एकत्र येण्यावर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. यासोबतच […]
दर महिन्याला पगार येतो, पण पैसे पुरत नाहीत? 80-20 चा हा नियम ठरू शकतो फायदेशीर
भारतात नोकरदार वर्गाची संख्या लाखोंमध्ये आहे. दर महिन्याला पगार खात्यात जमा झाला की, यावेळी पैसे व्यवस्थित वाचवायचे असा विचार अनेक जण करतात. मात्र महिना जसजसा पुढे जातो, तसतसे खर्च वाढत जातात आणि शेवटी पुन्हा खिशात पैसे शिल्लक राहत नाहीत. तुमच्यासोबतही असे होत असेल, तर याचा अर्थ तुमचे उत्पन्न कमी आहेच असे नाही. कदाचित तुमचे पैसे […]
आयकर विभागाची मोठी कारवाई! तब्बल 2143 कोटी… 16 नामांकित कंपन्यावर गुन्हा दाखल
लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे एका मोठ्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी एका चार्टर्ड अकाउंटंट (सीए) सह सोळा कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमारे 2143 कोटी रुपयांच्या निधीचा अपहार केल्याचा त्यांच्यावर गंभीर आरोप आहे. ही मोठी कारवाई आयकर विभागाने केलेल्या सलग चार दिवसांच्या विस्तृत झाडाझडतीनंतर करण्यात आली आहे, ज्यामध्ये अनेक आर्थिक अनियमितता समोर आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित […]
टेन्शन मिटलं! राज्यात साखर स्वस्त होणार? सरकारकडून केंद्राला महत्त्वाचा प्रस्ताव; नेमकी मागणी काय? तरतूद काय?
साखरेचे दर सध्या प्रचंड वाढल्याने ऐन सणासुदीत साखर सर्वसामान्यांना कडू झाली आहे. साखरेचे भाव ७० रुपयांवर पोहचले आहेत. सरकारने यामागे इथेनॉलचे धोरण जबाबदार नसून काळाबाजार जबाबदार असल्याचे म्हटले आहे. तर आता सहकार मंत्र्यांनी याबाबत एक जालीम उपाय सांगितला आहे. साखरेची दरवाढ रोखण्यासाठी सरकार एकीकडे साखर आयात करण्याचा विचार करत असताना सहकार मंत्र्यांनी चांगला उपाय सुचवला […]
भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर… ठाण्यात शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
सुनील जाधव : मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून कल्याण-डोंबिवलीतील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करताना घेतलेल्या भूमिकेवरून पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि माजी आमदार गणपत गायकवाड यांचे निकटवर्तीय असलेले दुर्गेश बागुल यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देत शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शिवसेनेच्या […]