• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ATM मध्ये खडखडाट… Cash चा मोठा तुटवडा… नागरिकांवर नवीन संकट? एटीएम इंडस्ट्रीजचा दावा काय?

June 5, 2026 by admin Leave a Comment


ATM Cash Shortage: देशातील एटीएममध्ये यावेळी रोख रक्कमेचा तुटवडा जाणवत आहे, अशी माहिती कॉन्फडेरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीने इंडियन बँक असोसिएशनला दिली आहे. त्यामुळे देशातील एटीएमवरच नाही तर नागरिकांवर नवीन संकट आले आहे. रोख रक्कमेच्या तुटवड्यामुळे अनेक एटीएमची सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. बिझनेस स्टँडर्डच्या एका वृत्तानुसार, पूर्वीच्या तुलनेत एटीएमचे व्यवहार कमी झाले आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी ऐन पेरणीच्यावेळी रोख रक्कम मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. ही अडचण दूर करण्याची मागणी करण्यात येत आहे.

मार्च आणि एप्रिलमध्ये सुद्धा रोख रक्कमेचा तुटवडा

आकड्यांनुसार, सर्व एटीएममध्ये रोख रक्कमेचा तुटवडा जाणवला होता. मार्च आणि एप्रिल महिन्यात एकूण 94,000 कोटी रुपयांची आवश्यकता होती. पण मार्च महिन्यात केवळ 61,000 कोटी रुपये आणि एप्रिल महिन्यात केवळ 54,000 कोटी रुपये उपलब्ध होऊ शकले. त्यामुळे ही मोठी तफावत समोर आली होती. तर मे महिन्यातही ग्रामीण भागातील एटीएममध्ये नोटांचा तुटवडा जाणवला. राज्यातील काही जिल्ह्यात याविषयीची ओरड करण्यात आली होती. तर मराठवाड्यातील एटीएममधून 500 रुपयांच्या नोटा गायब झाल्याचा आरोप आमदार अंबादास दानवे यांनी केला होता. अनेक एटीएमवर जात शिवसैनिकांनी 500 रुपयांच्या नोटा येत नसल्याचे डेमो दाखवले होते. तर याप्रकरणी बँकेच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

एटीएम इंडस्ट्रीजची मोठी माहिती

IBA ला CATMi ने पत्र लिहिले आहे. त्यानुसार देशातील अनेक राज्यातील बँकांच्या शाखांमधील एटीएममधून रोख रक्कम निघत नसल्याचे म्हटले आहे. ग्रामीण आणि निम्नशहरी भागातील एटीएममध्ये रोख रक्कमेची व्यवस्था करणे गरजेचे असल्याचे एटीएम इंडस्ट्रीने म्हटले आहे. बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या वृत्तानुसार, CATMi ने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलन विभागाला याविषयीची माहिती दिली आहे.

राज्यातही रोख रक्कमेचा तुटवडा

हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरात कॅशचा तुडवडा आहे. एटीएममध्ये ठणठणाट आहे. वसमत शहरातील ,एसबी आय,बँक ऑफ इंडिया या सह विविध भागांतील एटीएममध्ये कॅश नाही. कॅश उपलब्ध नसल्याने दैनंदिन व्यवहारावर परीणाम होत आहे. शेतकऱ्यांना ऐन पेरणीच्या तोंडावर रक्कम मिळत नसल्याने ते हवालदिल झाले आहेत. तर रोख रक्कमेचा तुटवडा नेमका कशामुळे झाला यावर बँक अधिकारी काहीच प्रतिक्रिया देत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

तर गेल्या महिन्यात 26 मे रोजी परभणी जिल्ह्यातील एसबीआय, आयडीबीआय, मध्यवर्ती बँक समोरील एटीएम मध्ये कॅश उपलब्ध नसल्याने एटीएम केंद्र बंद करण्यात आले होते. शहरातील अनेक एटीएम बंद असल्याने नागरिकांचे हाल झाले होते. परभणीत सतत होत असलेल्या कॅश तुटवण्याचा शेती आणि इतर व्यवसायांवर मोठा परिणाम जाणवत आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in