• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Aishwarya Rai : तुला बरबाद करुन ठेवेल…, सर्वांसमोर ऐश्वर्याला दिग्दर्शक असं म्हणाला तेव्हा…, अनेक वर्षानंतर सत्य अखेर समोर

August 14, 2026 by admin Leave a Comment


Aishwarya Rai : अभिनेत्री ऐश्वर्या राय हिला आज कोणत्याच वेगळ्या ओळखीची गरज नाही. ऐश्वर्याने तिच्या सौंदर्याच्या जोरावर आणि अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. आज तिचे काही सिनेमे प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहातात. पण ऐश्वर्याच्या आयुष्यातील एक काळ असा देखील होता, जेव्हा अभिनेत्रीने जीवनात चढ उतार देखील अनुभवले आहेत. आता प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक सुभाष घाई यांनी अभिनेत्रीबद्दल मोठा खुलासा केला आहे. ऐश्वर्या स्टारर ‘ताल’ सिनेमाला 27 वर्ष पूर्ण झाली आहे. सिनेमाबद्दल घाई, ऐश्वर्याला म्हणालेले, ‘तुला बरबाद करुन टाकेल…’, तर जाणून घ्या तेव्हा नेमकं काय घडलं होतं.

सुभाष घाई म्हणाले, ‘मला ताल सिनेमासाठी कोणती ब्यूटी क्वीन हवीच नव्हती, मला मानसी हवी होती, जी एका फार छोट्या शहरातील मुलगी आहे. ती तिच्या कौशल्याच्या आधारावर संघर्षमय आयुष्य बदलते. मी तेव्हा ऐश्वर्या राय हिला सांगितलं होतं, मला तुला बरबाद करुन ठेवेल. सिनेमासाठी तुला जास्त वेळ मेकअप करण्याची काहीही गरज नाही. मी दिग्दर्शक आहे तर माझ्यासाठी सिनेमातील प्रत्येक भूमिका महत्त्वाची आहे. तेव्हा मी फक्त माझ्या दिग्दर्शकाच्या भूमिकेबद्दल विचार केला…’

सांगायचं झालं तर, सुभाष घई यांच्या ‘ताल’ सिनेमातील ‘मानसी’ हे पात्र साधेपणा असलेली आणि त्याच वेळी एक कुशल नृत्यांगना असलेली अशी व्यक्तिरेखा होती. हे लक्षात घेऊन, सुभाष घई यांनी नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांना विचारलं की, माधुरी दीक्षितव्यतिरिक्त ही भूमिका आणखी कोण साकारू शकेल. त्यावर सरोज खान यांचं देखील एकच उत्तर होते, ऐश्वर्या राय.

‘ताल’ एक उत्तम सिनेमा होती. सिनेमामुळे सुभाष घाई यांच्या आत्मविश्वासात देखील वाढ झाली. सिनेमात ऐश्वर्या हिच्यासोबत अभिनेता अक्षय खन्ना याला स्पॉट करण्यात आलं होतं. आता ‘ताल 2’ सिनेमाची चर्चा देखील सर्वत्र रंगली आहे. असं देखील सांगण्यात येत आहे की, सिनेमाची स्क्रिप्ट पूर्ण झाली. आता सिनेमा कधी प्रदर्शिक होतो, याच प्रतिक्षेत चाहते आह .

‘ताल’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमातील गाणी आजही चाहत्यांच्या मनात आहेत. सिनेमात अनिल कपूर, ऐश्वर्या राय, अक्षय कुमार यांच्या शिवाय अमरीश पुरी, आलोक नाथ यांनी देखील महत्त्वाची भूमिका साकारली होती. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील बक्कळ कमाई केलेली.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सरसकट 80 ते 100 रुपयांची वाढ, कांद्यानंतर आता स्वयंपाकघरात दररोज उपयोगात येणारी वस्तुही महागली
  • भुलेश्वरचा राजा मूर्ती दुर्घटनेचं कारण पहिल्यांदाच समोर, गणपतीची मूर्ती का कोसळली? मोठा खुलासा
  • Shiv Thakare : सध्या भीतीचं वातावरण… शिव ठाकरेचा अविवाहित राहण्याचा निर्णय, मोठं वक्तव्य चर्चेत
  • आम्ही मार खाऊन आलेले लोक, पुढेही.. अभिजीत दिपके यांचे थेट मोठे विधान..
  • सगळंच संपलं.. अवघ्या 14 दिवसांत आईवडिलांना गमावलं, मराठी अभिनेत्याचा काळीज पिळवटून टाकणारा अनुभव

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in