
भारतीय हवामान विभागाने नुकताच पावसाचा मोठा इशारा दिला. 8 ते 13 जूनकरिता हा मोठा इशारा देण्यात आला. जवळपास देशातील सर्वच राज्यांमध्ये पाऊस वादळी वाऱ्यासह हजेरी लावेल.
हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, हरियाणा, चंदीगढ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, महाराष्ट्र, या राज्यात मॉन्सूनला अनुकूल वातावरण आहे. ईशान्य आणि मध्य भारतात मान्सूनने जोरदार आगमन केले असून,मुसळधार पावसाने अनेक भागांमध्ये हाहाकार माजवला आहे.
8 ते 11 जून दरम्यान अरुणाचल प्रदेशात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट अपेक्षित आहे. तर 10 ते 13 जून दरम्यान आसाम आणि मेघालयात पावसासह जोरदार विजांचा अंदाज आहे.
8 ते 13 जूनदरम्यान देशावर मोठं संकट आहे. यंदा मॉन्सून दोन दिवस उशिराने केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर मॉन्सूनला पोषक वातावरण देशात मिळत आहे.
मॉन्सून वेगाने पुढे सरकताना दिसत आहे. मॉन्सून पावसासह वादळी वाऱ्याचाही इशारा देण्यात आला. त्यामध्येच पुढील 24 तासाकरिता भारतीय हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा 21 राज्यात दिलाय.




Leave a Reply