
उन्हाळा म्हटले की, थंडगार ऊसाचा रस सर्वांना दिसतो. विशेष म्हणजे उन्हाळ्यात रस्त्याच्या कडेला मोठ्या संख्येने ऊसाच्या रसाचे दुकान असतात. अशावेळी आपण चालत चालत आरामात ऊसाचा रस पिऊ शकतो. ऊसाचा रस पिल्याने शरीर थंड होते. बरेच लोक उन्हाळ्यात ऊसाचा रस अधिक पितात. मात्र, उन्हापासून बचाव करण्याकरिता तुम्ही पित असलेला हा ऊसाचा रस आरोग्यासाठी धोकादायक सिद्ध होऊ शकतो. जर तुम्ही जास्त प्रमाणात ऊसाचा रस पित असाल तर थेट आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. गॅस्टोएंटेरोलॉजिस्ट तज्ज्ञ डॉक्टर मुकेश नंदाल यांनी लाईव्ह हिंदूस्थानला बोलताना म्हटले की, ऊसाचा रस शरीरात लगेचच एनर्जी देतो. पण ऊसाचा रस पिण्याचे काही गंभीर परिणाम देखील शरीरावर होतात. मुळात म्हणजे ऊसाच्या रसात नैसर्गिक साखर अत्यंत मोठ्या प्रमाणात असते.
ज्यामुळे शरीरातील फायबर झपाट्याने कमी होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे शुगर लवकर ब्लडमध्ये पोहोचू शकते. ज्यामुळे ब्लड शुगर वाढू शकते. मधुमेहाची समस्या असलेल्यासाठी हे धोकादायक आहे. जास्त प्रमाणात ऊसाचा रस पिल्याने फॅटी लिव्हरवर परिणाम होऊ शकतो. यासोबतच वजनही वाढण्याची शक्यता निर्माण होते.
मधुमेही, फॅटी लिव्हरची समस्या असलेल्या लोकांनी ऊसाचा रस पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासोबतच ऊसाचा रस पिण्यापूर्वी तुम्ही कोणत्याही सेंटरवर ज्यूस पित असाल तर तेथील स्वच्छता पाहा. असे नाही की, ऊसाचा रस आरोग्यासाठी धोकादायक आहे. पण तो नक्की किती पिला पाहिजे, यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.
मुंबईमध्ये बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 4 जणांचा दुर्दैवी अंत झाला. ज्यानंतर लोकांनी कलिंगडावरच बहिष्कार टाकला. त्यामध्येच आता ऊसाच्या रसाबद्दल तज्ज्ञांनी मोठा इशारा दिल्याचे बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे अनेक जण भर उन्हात ऊसाचा रस पितात, जे आरोग्यासाठी धोकादायक आहे. आपण जर ऊसाचा रस दररोज पित असाल तर एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यायला हवा.
Leave a Reply