• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सरकारची शानदार योजना, प्रत्येक महिन्याला मिळेल 5000 रुपयांची पेन्शन, केवळ 210 रुपयांची गुंतवणूक

April 24, 2026 by admin Leave a Comment


निवृत्तीची योजना नेहमीच लोक टाळत असतात. मात्र, नंतर म्हातारपणी ही मोठी समस्या बनते. अशात सरकारची अटल पेन्शन योजना ( APY ) त्यांना लोकांसाठी एक सुरक्षित पर्याय आहे, ज्यांना म्हातारपणी नियमित उत्पन्न हवे. खास बाब ही आहे की योजना गॅरंटीड पेन्शन देते आणि यात जोखीम देखील कमी आहे. अटल पेन्शन योजनेत पाच हजार मासिक पेन्शन मिळण्यासाठी गुंतवणूकीची रक्कम वयावर अवलंबून असते. १८ वर्षात २१० रुपये, ३० व्या वर्षी ५७७ रुपये आणि ४० मध्ये १,४५४ रुपये मासिक हप्ता भरावा लागतो. लवकरात लवकर गुंतवणूक सुरु केली तर मासिक हप्त्याची रक्कम कमी होते.

योजनेची लोकप्रियता वाढत आहे

APY योजनेची लोकप्रियतता सतत वाढतच आहे. २१ एप्रिल २०२६ पर्यंत या योजनेत ९ कोटीहून जास्त लोक जोडले गेले आहेत. यामुळे हे स्पष्ट आहे की ही योजना देशातील सामाजिक सुरक्षेचे एक मजबूत साधन होत आहे. खास करुन असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी.

काय आहे अटल पेन्शन योजना ?

ही एक सरकारी पेन्शन स्कीम आहे. जिला पेन्शन फंड रेग्युलेटरी एण्ड डेव्हलपमेंट अथॉरिटी ( PFRDA ) संचालित करते. यात तुम्ही १,००० रुपयांपासून ५,००० रुपयापर्यंत मासिक पेन्शन निवडू शकता. जी ६० वर्षांच्या वयानंतर मिळते. तुमची गुंतवणूक तुमचे वय आणि निवडलेली पेन्शन यावर अवलंबून असते. प्रत्येक महिन्याला निश्चित रक्कम तुमच्या खात्यातून ऑटो-डिडक्ट होते. ज्यामुळे बचत करणे सोपे होते.

५००० रुपये पेन्शनसाठी किती गुंतवणूक करावी लागेल ?

१८ वर्षाच्या वयात सुरुवात – दर महिन्याला सुमारे २१० रुपये जाम करावे लागतील. ( दीर्घ काळ ( ४२ वर्षे ) मिळाल्याने मासिक हप्त्याचे ओझे कमी.

३० वर्षाच्या वयात सुरुवात – दर महिने ५७७ रुपये जमा करावे लागतील.

४० वर्षाच्या वयात सुरुवात – दर महिन्याला १,४५४ रुपये जमा करावे लागतील ( कारण गुंतवणूकीचा वेळ केवळ २० वर्षांचा मिळतो. )

यात हे स्पष्ट आहे की जेवढे जास्त लवकर सुरुवात करणार तेवढा मासिक हप्ता कमी असणार आहे.

सर्वांना समान पेन्शन

वय काहीही असो, जर तुम्ही ५,००० रुपये पेन्शन निवडली, तर ६० व्या वयानंतर तुम्हाला दर महिन्याला निश्चित रक्कम मिळले. फरक केवळ एकूण गुंतवणूकीत असेल.

कुटुंबाला देखील मिळतो फायदा

या योजनेचा एक मोठा फायदा की पेन्शनर याच्या मृत्यूनंतर जीवनसाथीला देखील पेन्शन मिळत रहाते. दोघांच्या मृत्यूनंतर सुमारे ८.५ लाख रुपयांचा फंड नॉमिनीला मिळतो.

कोण-कोण लाभ घेऊ शकते ?

१८ ते ४० वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक, ज्याच्याकडे बँक वा पोस्ट ऑफीसमध्ये सेव्हींग अकाऊंट असेल तो या योजनेत सामील होऊ शकतो.

लवकर सुरु करणे का गरजेचे आहे ?

अटल पेन्शन योजनेला ( APY ) सर्वात मोठा संदेश हा आहे की ही योजना लवकर सुरु करावी आणि कमी गुंतवणूकीत सुरक्षित भविष्य बनवता येते. उशीर केल्याने दर महिन्यास जास्त पैसे भरावे लागतात. ही योजना त्या लोकांसाठी चांगली आहे ज्यांना कमी जोखीमेत गॅरंटीड पेन्शन हवी. आणि निवृत्तीनंतर जे आत्मनिर्भर राहू इच्छीतात.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! पुण्यात गोळीबाराचा थरार! 3-4 जण सलूनमध्ये शिरले अन्… वारजे परिसर हादरला
  • इराणशी घमासान सुरु असताना इस्रायलच्या पंतप्रधानांना कॅन्सरचे निदान, तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर
  • IPL 2026: गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात आरसीबीचा नकोसा विक्रम, शतकांच्या बाबतीत असं घडलं
  • Paytm पेमेंट्स बँकेला मोठा धक्का, RBI कडून परवाना रद्द; ग्राहकांवर काय परिणाम होणार?
  • RCB vs GT : आरसीबीसमोर 206 रन्सचं टार्गेट, गुजरात गतविजेत्यांना चिन्नास्वामीत विजयी अर्धशतकापासून रोखणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in