
1987 मध्ये प्रदर्शित झालेला ‘मिस्टर इंडिया’ हा हिंदी चित्रपट आजही त्याच्या वेगळ्या कथानक, दमदार अभिनय आणि अजरामर गाण्यांसाठी ओळखला जातो.
अनिल कपूर, श्रीदेवी आणि सतीश कौशिक यांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटातील ‘काटे नहीं कटते ये दिन ये रात’ हे गाणं जवळपास 39 वर्षांनंतरही रसिकांच्या आवडत्या रोमँटिक गाण्यांमध्ये गणले जाते.
हे गाणं किशोर कुमार आणि अलीशा चिनॉय यांनी गायले असून, अलीशाच्या मखमली आवाजाने आणि किशोर कुमार यांच्या सुरेल गायकीने त्याला विशेष आकर्षण मिळाले.
या गाण्याच्या लोकप्रियतेमागे त्याचे अप्रतिम चित्रिकरणही महत्त्वाचे ठरले. पावसात निळ्या साडीत श्रीदेवी यांचा मोहक अंदाज आणि अनिल कपूर यांची साधी, निरागस भूमिका यामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर करून गेले.
सुमारे 6 मिनिटे 30 सेकंदांचे हे गाणं त्या काळात रेडिओ आणि दूरदर्शनवर सातत्याने ऐकायला मिळत होते. आजही हे गाणं अनेकांच्या रोमँटिक प्लेलिस्टमध्ये आवर्जून बघायला मिळते.




Leave a Reply