
फडणवीस दिल्लीमध्ये जाणार राऊतांना हे दिवसा स्वप्न कुठून पडलं असं शेलारांनी विचारले. महाराष्ट्राचं नेतृत्व करायला देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत असं शेलारांनी म्हटलेलं आहे. संजय राऊतांना दिवसा स्वप्न कुठून पडलं? ते संजय नावाने असतील पण कर्तुत्वाने महाभारतातल्या संजयचा तसुभरही गुण त्यांच्यामध्ये नाही. त्यामुळे दिवा स्वप्न हे त्यांनी करू नये. निर्णय केंद्र सरकार घ्यायला मोदीजी सक्षम आहेत आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करायला देवेंद्रजी सक्षम आहेत. रोहित पवार हा कच्चा लिंबू आहे, अजून त्यांना पूर्ण माहिती नाही.
Leave a Reply