
दिल्लीत जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. नीट पेपर लीक झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी हे आंदोलन सुरु केले होते. त्यांची मागणी ही केंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रसाद यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. या विद्यार्थ्यांसाठी सोनम वांगचुक हे आमरण उपोषण सुरु होते. आता ज्या मंडपात हे आंदोलन सुरु होते त्याचा ताबा आता अभिजीत दिपके आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. काल दिल्लीतील या आंदोलनावर हिंसक वळण पाहायला मिळाले. पोलिसांनी अनेक आंदोलकांवर लाठीचार्ज केला. याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. पण आता दिल्लीत एक आंदोलन सुरु असताना आणखी एक संकट दिल्लीच्या दिशेने वाढत आहे. पंजाबमधील हजारो शेतकरी आज दिल्लीकडे मोर्चा काढण्यासाठी शंभू सीमेवर जमले आहेत.
भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित मुक्त व्यापार कराराविरोधात (FTA) हे आंदोलन होत आहे. हा करार रद्द करण्याच्या मागणीसाठी ‘देश बचाव मोर्चा’ने या आंदोलनाचे आवाहन केले आहे. याच दरम्यान, सोमवारी, दिल्लीतील प्रस्तावित किसान महापंचायतीला उपस्थित राहण्यासाठी जात असताना भारतीय किसान युनियनचे प्रमुख गुरनाम सिंग चदुनी यांना हरियाणा पोलिसांनी ताब्यात घेतले.या परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून, भारतीय दंड संहितेचे कलम 163 लागू करण्यात आले आहे. रस्त्याच्या दुतर्फा बॅरिकेड्स उभारण्यात आले असून, वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे.
अमृतसर आणि गुरदासपूर येथील शेतकऱ्यांचा ताफा शंभू सीमेमार्गे दिल्लीला पोहोचण्याची तयारी करत आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित मुक्त व्यापार करार तात्काळ रद्द करावा, ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, जर हा करार लागू झाला, तर त्याचा थेट परिणाम भारतीय शेती, दुग्धव्यवसाय आणि ग्रामीण लोकांच्या उपजीविकेवर होईल. त्यांच्या मते, परदेशी उत्पादनांच्या ओघामुळे देशांतर्गत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल आणि लहान शेतकऱ्यांच्या व्यवसायात व्यत्यय येऊ शकतो.
अराजकीय संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चाचे नेतेही आंदोलनात सामील होण्यासाठी लवकरच घटनास्थळी पोहोचण्याची शक्यता आहे. शेतकरी नेते सरवन सिंग पंढेर हे देखील या आंदोलनाचा भाग आहेत आणि त्यांची उपस्थिती या निदर्शनासाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी प्रशासनाने पोलीस तैनात केले आहेत. मागील आंदोलनांच्या तुलनेत पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. शंभू सीमेवरील सुरक्षा व्यवस्थेवरून हे स्पष्ट होते की, प्रशासनाला कोणताही व्यत्यय नको आहे. दरम्यान, शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे की, जोपर्यंत सरकार त्यांच्या मागण्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. संपूर्ण देश या घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, कारण याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर आणि देशाच्या व्यापार धोरणावर होतो. येत्या काही दिवसांत परिस्थिती कशी उलगडते याकडे सर्वांचे लक्ष असेल.
Leave a Reply