• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रितेश देशमुखने पोस्ट केला विलासराव देशमुख-अटल बिहारी वाजपेयी यांचा खास फोटो

August 17, 2026 by admin Leave a Comment


अभिनेता रितेश देशमुखने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर एक खास फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे. रितेशची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. यामध्ये त्याने वाजपेयी यांचं व्यक्तिमत्त्व आणि देशाच्या राजकारणातील त्यांचं योगदान अधोरेखित केलं आहे. एक कुशल राजकारणी, कवी आणि जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नेते, असा उल्लेख त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांचा केला आहे. विशेष म्हणजे पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन ज्यांच्याबद्दल सर्वच राजकीय पक्षांमध्ये आदर होता, अशा नेत्यांमध्ये वाजपेयींचं नाव अग्रस्थानी असल्याचंही रितेशने नमूद केलं.

रितेश देशमुखची पोस्ट-

‘श्री अटलबिहारी वाजपेयी हे भारताने घडवलेल्या सर्वोत्तम नेत्यांपैकी एक होते. एक मुत्सद्दी राजकारणी, कवी आणि पक्षांच्या सीमांच्या पलीकडे जाऊन प्रेम आणि आदर मिळवणारे लोकनेते.. अशा या महान व्यक्तिमत्त्वाला त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी विनम्र आदरांजली अर्पण करतो’, अशी पोस्ट रितेशने लिहिली आहे. रितेशने शेअर केलेल्या या फोटोमध्ये विलासराव देशमुख आणि अटलबिहारी वाजपेयी हे हस्तांदोलन करताना दिसत आहेत.

पहा फोटो-

Shri Atal ji was one of the finest leaders India has produced. A statesman, a poet, and a mass leader who was loved and respected across party lines — I pay my humble tribute to him on his death anniversary today. pic.twitter.com/D6zEqFnQ2O

— Riteish Deshmukh (@Riteishd) August 16, 2026

अटल बिहारी वाजपेयी यांनी तीन वेळा भारताचे पंतप्रधान म्हणून देशाचं नेतृत्व केलं. ते भारतीय राजकारणातील अत्यंत प्रभावी आणि लोकप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी भाजपला राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाचं स्थान मिळवून दिलं. वक्तृत्वकौशल्य, प्रभावी भाषणं आणि कवितांची आवड यांमुळे वाजपेयी यांनी राजकारणाच्या पलीकडेही स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. अटल बिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तिमत्त्वातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांची राजकीय विरोधकांशी असलेली संवादाची भूमिका. यामुळे वेगवेगळ्या विचारसरणीच्या नेत्यांमध्येही त्यांच्याबद्दल आदराची भावना होती.

रितेश देशमुख स्वत: राजकीय कुटुंबातून असून त्याचे वडील विलासराव देशमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते. त्यामुळे राजकारणातील अनेक दिग्गज नेत्यांशी देशमुख कुटुंबाचा जवळचा संबंध राहिला आहे. राजकारणी म्हणूनच नाही तर कवी आणि सर्वसामान्य नेता म्हणून वाजपेयींची आठवण कायम राहील, अशी भावना रितेशच्या या पोस्टमध्ये व्यक्त होत आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in