• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रिक्षाचालकांवर मराठी भाषा सक्तीच्या वादावर विशाल कोटियन म्हणाला, “महाराष्ट्रात राहायचं असेल तर..”

April 26, 2026 by admin Leave a Comment


1 मे नंतर मराठी भाषा बोलू न शकणाऱ्या रिक्षाचालकांचे परवाने थेट रद्द करण्याचे निर्देश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. राज्यातील रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. हा निर्णय मागे घ्यावा यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र कितीही विरोध झाला तरी या निर्णयावर आपण ठाम राहणार असल्याचं प्रताप सरनाईक वारंवार स्पष्ट करत आहेत. या वादावर आता ‘बिग बॉस मराठी 6’ फेम विशाल कोटियनने स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी यायलाच पाहिजे, असं त्याने म्हटलंय.

काय म्हणाला विशाल?

‘नवशक्ती’ला दिलेल्या मुलाखतीत विशाल म्हणाला, “माझा जन्म महाराष्ट्रात झाला. मी जन्माने, कर्माने आणि मनानेही मराठी आहे. मी मराठी नाटकांमध्येही काम केलं आहे. मध्यंतरी हिंदीत काम करताना माझी मराठी बोलायची सवय सुटली होती. पण आता बिग बॉस मराठीमुळे मला पुन्हा स्पष्ट मराठी बोलता येतंय. मला मराठी भाषेविषयी आणि महाराष्ट्राविषयी प्रचंड आदर आहे. तुम्हाला जर महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी यायलाच पाहिजे, याच मताचा मीसुद्धा आहे. बाहेरच्या राज्यांमध्येही असंच आहे. तुम्हाला मराठी येत नसेल तर शिका. पण इथे राहायचं असेल तर मराठी बोलावं लागेल. प्रताप सरनाईकांचा निर्णय योग्य आहे. मराठी यायलाच पाहिजे. मराठीत बोला, कारण हा महाराष्ट्र आहे.”

परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 1 मे पासून मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. मराठी लिहिता आणि वाचता न येणाऱ्यांचे तसंच मराठी भाषेचं ज्ञान नसलेल्यांचे वाहन परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. यासाठी भाजपने मराठी शिकवणी वर्गसुद्धा सुरू केले आहेत. काही रिक्षा चालकांनी त्यासाठी मराठी भाषेचे धडे घेण्यासही सुरुवात केली आहे. याआधी अभिनेता रितेश देशमुख, दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनीसुद्धा यावर प्रतिक्रिया दिली होती. “महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्यच असली पाहिजे. आपण जेव्हा दुसऱ्या राज्यात जातो, तेव्हा आपणही त्यांची भाषा बोलली पाहिजे. त्यामुळे प्रताप सरनाईक यांनी जो काही हा निर्णय घेतला आहे, तो योग्यच आहे”, अशी प्रतिक्रिया रितेशने दिली होती.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • या तीन गोष्टी बायकोला पण सांगू नका, चाणक्यांनी दिला सुखी संसाराचा मंत्र
  • सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवतोय? आज पासून दुधासोबत घ्या ‘हा’ पदार्थ
  • तुमच्या घरातही असू शकतो साप, या 5 जागा म्हणजे सापांचे माहेरघर; लपून करू शकतो हल्ला
  • LSG vs KKR: लखनौ आणि कोलकात्यासाठी अस्तित्वाची लढाई, नाणेफेकीचा कौल जिंकत पंत म्हणाला…
  • इराण -अमेरिकेमध्ये मध्यस्थी तर केली, पण आता पाकिस्तानवर हातात कटोरं घेण्याची वेळ, तब्बल 200 अब्ज रुपयांचा फटका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in