• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

यश भेटला नाही म्हणून चाहत्यांने उचललं टोकाचं पाऊल, शेवटी चिठ्ठीत जे काही लिहिलं ते…, खुद्द अभिनेत्याकडून मोठा खुलासा

August 16, 2026 by admin Leave a Comment


अभिनेता यश सध्या ‘रामायण’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त यश याची चर्चा रंगली आहे. केजीएफ सिनेमानंतर यश याच्या चाहत्यांच्या संख्येत फार मोठी वाढ झाली. पण चाहत्यांची संख्या वाढल्यानंतर अभिनेत्याला मोठे निर्णय देखील घ्यावे लागले. सांगायचं झालं तर, यशची भेट झाली नाही म्हणून एका चाहत्यांने स्वतःचं आयुष्य संपवलं… त्यानंतर देखील अशा काही घटना घडल्या ज्यामुळे यश याने चाहत्यांना न भेटण्याचा निर्णय घेतला. ‘आप की अदालत’ या शोमध्ये अभिनेत्याने मोठा खुलासा केला.

यश याने वाढदिवशी आता सर्वांना भेटणं पूर्णपणे बंद केलं आहे. अभिनेत्याच्या वाढदिवशी अशी एक घटना घडली ज्यामुळे अभिनेत्याने मोठा निर्णय घेतला. यश म्हणाला, ‘सुरुवातीला चाहत्यांना मी भोटायचो, पण लोकप्रियता वाढत गेल्यानंतर मोठ्या दुर्घटना घडू लागल्या. म्हणून मी चाहत्यांना भेटणं बंद केलं आहे. 2021 मध्ये मी वाढदिवशी घरीच नव्हतो. तेव्हा माझी फार जवळची व्यक्ती अभिनेते अंबरीश यांचं निधन झालं होतं. पण चाहत्यांना असं वाटलं की, मी घरात असून देखील त्यांना भेटलो नाही. वाढदिवशीच्या मी न भेटल्यामुळे एका चाहत्याने स्वतःला पेटवून घेतलं…’

‘त्याने आत्महत्या केल्यानंतर मला प्रचंड वाईट वाटलं. त्यानंतरच्या वाढदिवशी बॅनर लावताना एका चाहत्यांचा हात तुटला. तर अशाच घटनात आणखी तीन चाहत्यांचा मृत्यू झाला. अशा घटना घडत असल्याने मला आता खूप भीती वाटते. त्यामुळे मला असं वाटतं कोणी मला भेटलं नाही तरी चालेल. फक्त माझे सिनेमे पाहा… तेवढंच माझ्यासाठी तेवढं देखील पुरेसं आहे.’, असं देखील अभिनेत्याने सांगितलं आहे.

चाहत्याच्या सुसाईड नोटमध्ये यशचं नाव…

आत्महत्या केलेल्या चाहत्याने सुसाईड नोटमध्ये यश आणि तत्कालीन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी उपस्थित राहवं… अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र यश चाहत्यांच्या अंत्यसंस्काराला पोहोचला नाही. याचं कारण सांगत यश म्हणाला, ‘मी तिथे गेलो असतो तर, अनेकांना वाटलं असतं की, त्यांनीही असं पाऊल उचललं असतं तर, मी त्यांच्याही अंत्यसंस्काराला गेलो असतो… तिथे जाऊन मला काय मिळणार होतं? मला प्रचंड दुःख झालं होतं. पण मी असा देखील विचार केला की, तिकडे जाऊन मला काय मिळालं असते.’ असं देखील यश म्हणाला.

 

 

 

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in