
मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सरकारने गव्हाच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे.
भारताचा जगातील सर्वाधिक गहू उत्पादक देशांमध्ये समावेश होतो. परंतु सरकारी काही वर्षांपूर्वी गव्हाच्या निर्यातीवर बंदी घेतली होती.
परकीय व्यापार महासंचालनालयाने एका अधिसूचनेत हा निर्णय जाहीर केला आहे. सरकारने गहू, पीठ आणि इतर उत्पादनाच्या निर्यातीस मंजुरी दिली आहे.
मोदी सरकारच्या निर्णयाने गव्हासाठी इतर देशांवर अवलंबून राहणाऱ्या देशांना दिलासा मिळणार आहे. जगात गहू उत्पादक देशात भारताचा दुसरा क्रमांक लागतो.
देशात गव्हाच्या पिकाने उत्पादनात विक्रमी उच्चांक गाठला आहे. मागील वर्षी गव्हाचं उत्पादन हे 120.6 दशलक्ष टन इतकं झालं होतं.




Leave a Reply