• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! अमेरिका, इराणचा एकाचवेळी भारताला मोठा दणका, झोप उडवणार नवं संकट, अत्यंत वाईट बातमी

April 16, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका आणि इस्त्रायलमध्ये युद्धविरामाची घोषणा झाली आहे. मात्र अजूनही स्ट्रीट ऑफ होर्मूजचा तिढा सुटलेला नाहीये. युद्धविरामानंतर इस्त्रायलने तातडीने स्ट्रीट ऑफ होर्मूज सुरू करावा अशी अट अमेरिकेनं ठेवली होती. मात्र युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर देखील इराणने अमेरिकेची ही अट धुडकावून लावली आहे. स्ट्रीट ऑफ होर्मूजमधून एकादिवशी केवळ 15 चं जहाजं जातील असं इराणने म्हटलं आहे. एकीकडे इराणने स्ट्रीट ऑफ होर्मूजवर नियंत्रण मिळवलं आहे, तर दुसरीकडे आता डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील मोठं पाऊल उचललं आहे, ट्रम्प यांनी या मार्गाने प्रवास करणाऱ्या जहाजांना प्रतिबंध केला आहे. त्यामुळे जगभरात मोठं संकट निर्माण झालं आहे. आता याचा भारतावर कितपत परिणाम होणार? असा सवाल सध्या उपस्थित करण्यात येत आहे.

भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा आयातदार देश आहे. भारत आपल्या गरजेच्या तब्बल 85 टक्के कच्च्या तेलाची आयात इतर देशांकडून करतो. भारत ज्या देशांकडून कच्च्या तेलाची आयात करतो, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आखाती देशांचा समावेश आहे. त्यामुळे मध्य पूर्वेत निर्माण झालेल्या या तणावाचा भारताच्या ऊर्जा क्षेत्रावर थेट परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे. भारतामध्ये जेवढं तेल येत त्यातील सुमारे 40 टक्के तेल हे एकट्या स्ट्रीट ऑफ होर्मूजमधून येतं, त्यामुळे चिंता वाढली आहे.

परंतु एक दिलासादायक बाब म्हणजे इराणने भारतासारख्या अन्य काही देशांना स्ट्रीट ऑफ होर्मूजमधून जाण्याची परवानगी दिली आहे. मात्र इथे भारताला इराणच्या धोरणाचा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण दिवसभरात फक्त 15 च जहाजांना या मार्गाने जाण्याची परावानगी देण्यात आली आहे. त्यामुळे भारताला युद्धापूर्वी ज्या क्षमतेनं कच्च्या तेलाचा आणि एलपीजी गॅसचा पुरवठा होत होता, त्यापेक्षा कितीतरी कमी पटीने पुरवठा सध्या सुरू आहे. हा भारतासाठी एक मोठा धक्का आहे, तर दुसरीकडे अमेरिकेनं देखील या सामुद्रधुनीमधून जाणाऱ्या जहाजांना बंदी घातली आहे. मात्र हे करत असताना अमेरिकेनं हे देखील स्पष्ट केलं आहे, की ही बंदी फक्त इराण पोर्टशी संबंधित असलेल्या जहाजांनाच असेल. मात्र इराण आणि अमेरिकेमुळे स्ट्रीट ऑफ होर्मूजमध्ये एवढा तणाव वाढला आहे की, या सामुद्रधुनीमधून तेलाची वाहतूक करण्याची रिस्क अनेक कंपन्या घेताना दिसून येत नाहीयेत.

मध्य पूर्वेत निर्माण झालेल्या तणामुळे युद्ध सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे, ज्याचा थेट परिणाम हा भारतावर झाला आहे. भविष्यात पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच कच्चा माल महाग झाल्याने अनेक वस्तूंचे दर देखील वाढले आहेत.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नारी शक्ती विधेयकावर वादळी चर्चा, अरविंद सावंत आक्रमक, संसदेत नेमकं काय घडलं?
  • IPL 2026 स्पर्धेत आरसीबी नवा इतिहास रचण्याच्या वेशीवर, असं करताच 14 वर्षे जुना विक्रम मोडणार
  • नर्गिससोबत बोलायचं आहे… आतल्या खोलीत नेलं अन्… सोलापूर भयंकर घटनेनं हादरलं
  • जर तुम्ही दररोज हे 8 सुपरफूड्स खाल्ले तर रहाल स्लिम आणि फिट
  • घरच्या घरी सोप्या पद्धतीनं तूप कसं बनवायचं ? जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in