
मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदावरील दावा अधिक मजबूत करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मिशन टायगर सक्रिय केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संख्याबळ वाढवून महापौरपद मिळवणे ही शिंदे शिवसेनेची प्रमुख रणनीती आहे. यासाठी ठाकरे गटाच्या नगरसेवकांना आपल्याकडे आकर्षित करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
महायुतीमधील सव्वा वर्षांच्या फॉर्म्युल्यानुसार, अडीच वर्षांनंतर शिंदे गटाचा महापौर मुंबई महापालिकेवर विराजमान होणार असल्याचे कळते. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत शिंदे शिवसेनेला याबद्दल शब्द दिल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्याच्या घडीला भाजपचे ८८ नगरसेवक, ठाकरे गटाचे सुमारे ६४-६५, तर शिंदे गटाचे २९ नगरसेवक आहेत. काँग्रेसकडे २४, मनसेकडे ६, एमआयएमकडे ८ (२ अपात्रतेच्या टांगत्या तलवारीखाली), अजित पवार राष्ट्रवादीकडे ३ (१ अपात्रतेच्या टांगत्या तलवारीखाली) आणि समाजवादी पक्षाकडे २ नगरसेवक आहेत. या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर, मिशन टायगरद्वारे शिंदे गट आपले स्थान अधिक बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.
Leave a Reply