• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

महिलांना आजपासून मिळणार 3 हजार, अन्नपूर्णा योजनेला सुरूवात, पश्चिम बंगाल सरकारने..

June 3, 2026 by admin Leave a Comment


पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. पश्चिम बंगालमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारत एक हाती सत्ता मिळवली. निवडणुकीदरम्यान काही मोठ्या घोषणा भाजपाकडून करण्यात आल्या. त्यात सर्वात महत्वाची म्हणजे राज्यातील महिलांना दर महिन्याला 3000 रूपये मिळतील, अशी घोषणा केली. आता भाजपाकडून दिलेले वचन पूर्ण केले जात आहे. आजपासून पश्चिम बंगालमध्ये अन्नपूर्णा योजनेला सुरूवात होईल. मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी या योजनेची घोषणा केली. महिलांना दरमहिन्याला 3000 हजार रूपये मिळणार आहेत. बॅंकेच्या खात्यात महिलांचे हे पैसे थेट जातील. महिला घरगुती खर्च आणि इतर गोष्टींकरिता सरकारकडून ही मदत दिली जात आहे. भारतीय जनता पक्षाने निवडणुकीदरम्यान काही घोषणा केल्या होत्या. त्यात ही अन्नपूर्णा योजना होती. ममता बनर्जींच्या लक्ष्मी भंडार योजनेची जागा आता या योजनेने घेतली.

लक्ष्मी भंडार योजनेत महिलांना दर महिन्याला सरकारकडून 1500 रूपये दिली जात होती. आता अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून महिलांना दुप्पट म्हणजेच 3000 रूपये सरकारकडून दिली जाणार आहेत. मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी सांगितले होते की, सरकारच्या लोक घरोघरी जाऊन या योजनेकरिता अर्ज भरण्याकरिता महिलांची मदत करत आहेत. 2 कोटी महिला या योजनेचा लाभ घेतील, असा अंदाज आहे.

यासोबतच मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या योजनेकरिता ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने महिला अर्ज करू शकतात. याकरिता विशेष टीम देखील तयार करण्यात आली. या योजनेसाठी अर्ज करण्याकरिता सरकारकडून काही नियम आणि अटी लागू करण्यात आल्यात. या योजनेकरिता अर्ज फक्त महिलाच करू शकतात. यासोबतच महिला ही पश्चिम बंगालची रहिवासी असावी. यामध्ये 25 ते 60 वयोगटापर्यंतच्या महिला अर्ज करू शकतात.

अर्ज करणाऱ्या महिला या आयकर भरणाऱ्या नसाव्यात. यासोबतच रिटायर्ड कर्मचाऱ्यांनाही या योजनेकरिता अर्ज भरता येणार नाही. या योजनेच्या माध्यमातून पश्चिम बंगालच्या महिलांना दरमहिन्याला 3000 हजार रूपये मिळणार आहेत. महाराष्ट्र सरकारने देखील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अशाच प्रकारची योजना सुरू केली. त्या योजनेमधून महिलांना दरमहिन्याला 1500 रूपये मिळतात. मात्र, आता या योजनेतून तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पेणमधील मुर्तीकारांची मेहनत पाण्यात! गणेशोत्सव काही महिन्यांवर असतानाच भयंकर घडलं…
  • Mumbai Rain Traffic | पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई! कुर्ला-सायनमध्ये पाण्यामुळे वाहतूक कोलमडली
  • Ketan Agarwal Death : केतनला धक्का कुणी दिला? सिया की चेतन? गूढ वाढलं; पोलीसही…
  • ते अजरामर गाणे… सिगारेटचा वास घेऊन गायिले किशोर कुमारांनी गायले, रेकॉर्डिंग पूर्ण होताच…
  • करीना कपूरचं थेट जसप्रीत बुमराहला चॅलेंज; क्रिकेटरने दिलेलं उत्तर वाचून तुम्हीही व्हाल खुश!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in