• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला दिला थेट इशारा

August 29, 2026 by admin Leave a Comment


बातमी. मनोज जरांगे पाटलांचा आजपासून अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू होतंय. मागण्या मान्य न झाल्यास मुंबईमध्ये येणार असा इशाराच जरांगेंनी दिलाय. दरम्यान उपोषण करण्याआधीच जरांगे नाटक करा अशी मागणी सदावर्तेनी केली आहे. जरांगे एकनाथ शिंदेंचा माणूस असल्याचा आरोपही सदावर्तेनी केलाय. जरांगेंचा आजपासून अंतरवालीमध्ये उपोषण सुरू होतंय. दहावं उपोषण त्यांच्याकडून सुरू होणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास मुंबईमध्ये येणार असा निर्वाणीचा इशाराच जरांगे पाटलांकडून देण्यात आलेला आहे. या आधी सुद्धा सरकारच्या शिष्ट मंडळाकडून त्यांची भेट घेण्यात आली. आणि उपोषण करू नये अशी विनंती करण्यात आली मागण्या ज्या आहेत त्या मान्य केल्या जातील असं सांगण्यात आलं. मात्र जोपर्यंत संपूर्ण मागण्या मान्य होत नाहीत. एकही मागणी अर्धवट राहिली तर आपण मागे हटणार नाही, असा निर्वाणीचा इशारा जरांगे पाटलांकडून देण्यात आलाय. तर रामनाथ ढाकणे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. रामनाथ सकाळी दहा वाजल्यापासून जरांगे पाटलांचं हे दहावं उपोषण सुरू होतंय. आपण उपोषणापासून मागे हटणार नाही असा इशाराच त्यांनी दिलेला आहे. नक्कीच वृषाली आपण पाहू शकतो की मनोज दरांगे पाटील यांचं शेवटचं आणि निर्णायक उपोषण जे आहे ते अंतरवाली सराटीमध्ये आज सकाळी 10:00 वाजल्यापासून सुरू होणार आहे. ज्या ठिकाणी उपोषणाला दरांगे पाटील बसणार आहे त्याच ठिकाणी सध्या मी उभा आहे. आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प पुष्पहार अर्पण करून दरांगे पाटील अभिवादन करतील आणि त्यानंतर दरांगे पाटील 10:00 वाजता या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहे.

खरं तर निर्णायक आणि शेवटचं आमरण उपोषण असल्याचं जरांगे पाटलांनी यापूर्वी जाहीर केलेलं आहे. त्यामुळे आपण पाहतोय की सकाळी 10:00 वाजता या आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे आणि आपण जर इकडे पाहिलं तर ग्रामदैवत आहे. ग्रामदैवतांचं दर्शन घेऊन जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहे. खरं तर ज्या प्रलंबित मागण्या होत्या त्या आता एकही मागे ठेवायच्या नाही असा निर्धार जो आहे तो जरांगे पाटलांनी केलेला आहे. त्यामुळे आता सरकारला सुट्टी नाही असा थेट इशारा जो आहे तो दरांगे पाटलांनी सरकारला दिलेला आहे. त्यामुळे आता वेळ सुद्धा देणार नाही असं सुद्धा दरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे. यावेळी अनेकदा उपोषण झाली मात्र सरकारकडून आश्वासन दिली गेली असं देखील जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे. शिष्टमंडळ देखील भेटीला आलेलं होतं मात्र कोणताही ठोस आश्वासन त्या ठिकाणी दिलं गेलं नसल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलंय. त्यामुळे आज राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा अंतरवाली सराटीमध्ये त्यांची भेट घेण्यासाठी येणार आहे. त्यामुळे आजच्या दिवसभरात काय काय घडामोडी घडतात आणि काय नेमकी चर्चा होते हे देखील पाहणं तितकच महत्त्वाचं ठरणार आहे वृषाली. रामनाथ अंतरवालीमध्ये येण्याचं जरांगेकडून आवाहन करण्यात आलेलं आहे संपूर्ण मराठ्यांना ज्यांना ज्यांना जात प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे रात्रीपासूनच मराठे जे आहेत ते अंतरवाली सराटीमध्ये यायला देखील सुरुवात झालेली आहे. धन्यवाद रामनाथ दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. फडणवीसांचं ऐकून सगळंच करू नये. शिंदेचं ऐकून मराठ्याचं वाटोळं करू नये. हा या दोघांनी जे डाव रचलाय ना मराठ्यावर खालच्या मंत्र्याने नीट राहा नाहीतर इतकी बेकार वेळ येणार आहे तुमच्यावरती. अरे तू ज्यांची राखी बांधून घेणार आहे. ज्या बहिणीची तिच्या लेकराचं काय झालं बघ ना. फडणवीस शिंदे बघ ना ज्या बहिणीकडून राखी बांधून घेणार आहे. त्याच्यासाठी मराठ्याच्या आंदोलनाला ध्यान द्यायला तुम्हाला वेळ नाही.

कायद्याला धरून असणारा पुन्हा सुधारित जीआर चांगले काढून मराठ्याला या आंदोलनात सुटसुटीत व्यवस्थित देऊन टाका. नसता तुम्हाला त्या सरकारला तुमच्या अधिकाराला अधिकारात आम्ही ठेवणार नाहीत या शब्दाचा अर्थ समजून घ्या. मला वाटतंय जो 58 लाख नोंदीचा मुद्दा जो आहे त्यांचा जे न्यायमूर्ती समितीच्या स्थापनेनंतर शोधलेले आहेत. आम्ही त्यांना आजही आमची तयारी आहे की 58 लाख नोंदीमध्ये जे लोक अर्ज करतील आम्ही त्यांना दाखले द्यायला तयार आहोत. आता याच्यात उपोषण त्यांनी करू नये असच आमचा सरकारचा आग्रह आहे. मनोज जरांगे हे प्यादा मनोज जरांगे ही व्यक्ती मनोज जरांगे हा सेवक माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आहे कारण मी ह्या पूर्वी म्हणालो होतो बावनकुळे साहेबांना डुक्कर तोंड्या म्हणल्याच्या नंतर एकनाथ शिंदे साहेबांनी निषेध सुद्धा नोंदवलेला नाही. हे सगळं अतिरिक्त भाषा आहे हे कोणीतरी त्याला फीड केलेली भाषा आहे. हा कुणाचा तरी प्यादा आहे राजकीय प्यादा आहे. नाही 29 ऑगस्टला अंतरवालीतच होणार. पण यांनी नाही दिलं तर मुंबईत होणार. दोनदाच ठरायचंय. होईन ना तारीख डिक्लेअर मराठ्याला काय सांगायची गरज नाही. 45 लाख गाड्या मुंबईत जाणार आहेत 45 लाख. 80 ते 90 लाख कोटी मुंबईत असणार आहेत. पहिल्या टप्प्यात पहिल्या टप्प्यात आणि तुम्हाला आपण बोलतो ते सिद्धच करतो. पाच टप्पे होणार आहेत पाच टप्प्यात 6 कोटी मराठा मुंबईत जाणार आहे. आम्ही देखील त्यांना विनंती केली होती की मुंबईमध्ये सणासुदीचे दिवस आहेत रक्षाबंधन दहीकाला गणपती या काळात मुंबईमध्ये फार मोठ्या प्रमाणात उत्सव असतो त्यामुळे त्यांनी मुंबईत येऊ नये त्या निश्चित त्या मागण्यांवरती अभ्यास चालू आहे बैठका चालू आहे. मंत्रालयातून आदेशाची वाट पाहू नका तर या मनोज जरांगेला नुसता एफआयआर करू नका. याला तातडीने अटक करा. हिंसक भाषा करणारे हे आंदोलक नसतात तर ते देशद्रोही भाषा करणारा मनोज जरांगे



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जरांगेंच्या आंदोलनाआधीच सरकारला थेट इशारा, ‘मुंबईचा बी प्लॅन’ तयार; काय घडतंय?
  • मनोज जरांगे यांची उपोषणाआधीच सरकारकडे सर्वात मोठी मागणी, थेट सरकारलाच दिलं चॅलेंज
  • मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय घडामोडींना वेग
  • Nepal Flood: नेपाळच्या महाप्रलयात आतापर्यंत 626 जणांचा मृत्यू, 1924 बेपत्ता, 320 भारतीयांचा पत्ता नाही
  • Nepal flood update: नेपाळ पुराबाबत मोठी अपडेट! चीनने लपवली माहिती, लोकांशी बोलण्यासही मनाई

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in