• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ममता बॅनर्जींना आणखी एक हादरा! TMC च्या बालेकिल्लात भाजपचा झेंडा, बंगालच्या राजकारणातून मोठी बातमी

May 24, 2026 by admin Leave a Comment


विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील फलता विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार देबांग्शु पांडा यांनी मोठा विजय मिळवला आहे. ही जागा यापूर्वी तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला होती, मात्र आता यावर भाजपने झेंडा फडकवला आहे. या मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे आरोप झाले होते, त्यामुळे संपूर्ण मतदानच रद्द करून पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता.

1 लाखांपेक्षा जास्त मतांनी भाजपचा विजय

फलता विधानसभा मतदारसंघात पुनर्मतदानानंतर झालेल्या मतमोजणीत भाजपने तब्बल एक लाख मतांच्या फरकाने विजय मिळवत टीएमसीला मोठा धक्का दिला आहे. या निकालानंतर पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा मतांची चोरी झाल्याचा दावा केला असून केंद्रीय सुरक्षा दलातील काही जवान भाजपचे एजंट बनून मतमोजणी केंद्रात गेल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

88 टक्के मतदान

फलता विधानसभा मतदारसंघ हा दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात असून तो टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे हा भाग टीएमसीचा बालेकिल्ला मानला जात होता. 29 एप्रिल रोजी येथे पहिल्यांदा मतदान झाले होते. मात्र मतदानादरम्यान ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड, बूथ कॅप्चरिंग आणि मतदारांना धमकावल्याचे गंभीर आरोप झाले. परिस्थिती इतकी बिघडली की निवडणूक आयोगाने संपूर्ण मतदारसंघातील मतदान रद्द केले. त्यानंतर 21 मे रोजी सर्व 285 मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कडक सुरक्षाव्यवस्थेमुळे मतदान शांततेत पार पडले आणि 88 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली होती.

भाजप उमेदवाराची सुरुवातीपासून आघाडी

आज झालेल्या मतमोजणीत सुरुवातीपासूनच भाजपचे देबांग्शु पांडा आघाडीवर होते. प्रत्येक फेरीनंतर त्यांची आघाडी वाढत गेली आणि अखेर त्यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. दुसऱ्या क्रमांकावर सीपीएमचे संभू नाथ कुर्मी राहिले, तर काँग्रेसचे अब्दुर रज्जाक मोल्ला तिसऱ्या क्रमांकावर होते. टीएमसीचे जहांगीर खान चौथ्या स्थानावर राहिले. विशेष म्हणजे पुनर्मतदानाआधीच जहांगीर खान यांनी निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती.

बंगालच्या राजकारणात खळबळ

दरम्यान, फलता मतदारसंघातील हा निकाल राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. अभिषेक बॅनर्जी यांच्या प्रभावक्षेत्रात भाजपने एवढ्या मोठ्या फरकाने विजय मिळवल्याने पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. हा निकाल ममता बॅनर्जी आणि टीएमसीसाठी मोठा राजकीय इशारा मानला जात आहे. आता आगमी काळात टीएमसी कसे पुनरागमन करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Rain Update : 24, 25, 26, 27, 28 जून रोजी तुफान पाऊस, थेट अतिवृष्टीने धरणं भरणार, पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज समोर!
  • चोरून आणलेलं मनी प्लांट लावताय? होईल पश्चात्ताप, कर्जात जाल बुडून, वाचा काय होणार?
  • 2004 कॉल्स… 238 तास गप्पा… चेतनच्या प्रेमात अखंड बुडाली होती सिया.. केतन अग्रवाल हत्याकांडात तो एक धाग ठरला महत्त्वाचा
  • अखेर इराण झुकला… अमेरिकेची ती अट मान्य, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ
  • जवळ असतील हे गुण तर तिजोरी जाईल भरून, श्रीमंती घेईल पायाशी लोळण, चाणक्य नीती काय सांगते?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in