• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मनोज जरांगे पाटील यांचे मोठे आवाहन, समाज हितासाठी अंतरवालीत या..

August 16, 2026 by admin Leave a Comment


मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आवाहन केले. मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, मराठा जातीचा एकही प्रमाणपत्र जाऊ देणार नाही. आता 29 च्या आंदोलनात सुट्टी नाही. सातारा, औंध घ्यायचा GR घ्यायचा आहे.  SEBC आणि EWS मधून ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली त्यांनी अर्ज घेऊन अंतरवाली यावं, सगळ्या पोरांनी यायचं आहे.  आमची निवड झाली. मात्र, आम्हाला नियुक्ती दिली नाही. तुम्ही जर आले नाही तर माझ्या नावाने बोलायचं नाही, तुम्ही जर दुसरीकडे कुठे काम करत असेल तर तुमच्या भावाला वडिलांना पाठवा. ज्यांचे कुणबी सापडली त्यांनी, कोणाकडे अर्ज केला, कोणत्या भाषेतून सापडली त्यांनी एक अर्ज इकडे द्यायचा आणि तिकडे अधिकाऱ्याला द्यायचा. प्रमाणपत्र घेतल्याशिवाय आंतरवाली सोडायचे नाही.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे ज्यांचे व्याज परतावाराला त्यांना राहिला त्यानी सुद्धा अर्ज घेऊन यायचं.  सगळ्याच्या वतीने चार-पाच जणांनी यायचं नाही, प्रत्येकाने आपला अर्ज घेऊन यायचा आहे. काम होत नाही तर अंतरवाली सोडून जायचं नाही. ज्या पोरांना पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजना भेटली नाही, त्यांनी सुद्धा अर्ज घेऊन यायचं आहे.

जर ते पोर शिकायला असतील तर भाऊ किंवा वडिलांना पाठवा.  अभ्यास काय म्हणतात ते पाहायचं नाही ते सगळं राजकीय स्वार्थासाठी चालले आपलं गरीबासाठी चाललय. त्याच्या कोणत्या कोणत्या योजना बंद केल्या त्याचा सुद्धा अर्ज घेऊन या. त्या योजना सुरू होईपर्यंत त्यांनी अंतरवाली सोडायची नाही. अर्जदारासाठी स्वतंत्र जागा दिली जाणार आहे, अभ्यासासाठी स्वतंत्र जागा दिली आहे.

मंत्री आला की बोलायचं नाही मीडियात बोंबलायचं नाही. अंतरवाली शहाणपणा करायचा नाही, नसता पाय ठेवायचा नाही. सारथीच्या ज्या योजना बंद पडल्यात त्या पुन्हा सगळ्या सुरू करून घ्यायच्या आहेत. आपण उन्हात आंदोलन केले तेव्हा सरकारने ओबीसीचे GR काढला. पण पोरांनीसगळी फीस भरली, शिंदे आणि फडणवीस पागल समजता आम्हाला.
समाजाने डोक्यावर घेतल्यामुळे तुम्ही मुतणार का.

पुढे मनोज जरांगे यांनी म्हटले, वर्षभरात फडणवीसांना एका शब्दांना दुखवल नाही.परिवहन विभाग, MIDC चा GR काढला का तुम्ही? त्यांच्या बलिदान दिलं त्यांच्या कुटुंबांना नोकरी द्या म्हणून. महाराष्ट्र सगळ्या केसेस तुम्ही मागे घेतल्या का? तुम्ही समाजावर खोटे नाटे गुन्हे दाखल केले आम्हा माझ्यावर हल्ला केला. वेळ प्रसंगी आम्ही मुंबईत येऊ शकतो, मी आंदोलन कुठेही करू तुमच्या लेकराच कल्याण करतो.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in