• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मंत्री छगन भुजबळ यांचे मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल मोठे विधान, थेट म्हणाले, ओबीसी आरक्षण..

August 23, 2026 by admin Leave a Comment


मंत्री छगन भुजबळ यांनी नुकताच मोठे विधान केले. छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल हे विधान केले. छगन भुजबळ यांनी म्हटले की, ओबीसीचे आरक्षण संपले कोण म्हणते. जात पडताळीमध्ये चुका असेल तर त्यावर आम्ही लढतोय.  2011 पासून जात जनगणना करावी ही आमची मागणी होती, त्यावर सरकारने निर्णय घेतला आहे. सरकार आमच्यासोबत आहे, त्यावर आम्ही आता काय बोलणार. महात्मा फुले यांचे वांगमय भाषण यावर आम्ही मागणी केली. त्यावर सरकार करत आहे. जरांगे पाटील यांच्याबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की, मनोज जरांगे यांची लढाई आमच्या विरोधात नाही त्यावर आम्ही काय बोलणार. सरकार त्यावर बोलेल आणि निर्णय घेईल. आम्ही जात गणना मागणी केली त्यावर सरकार काम करत आहे. ओबीसीमध्ये किती जात त्यावर निर्णय सरकार घेणार आहे.

छगन भुजबळांनी लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत हाकेंचे सर्व आरोप फेटाळले. जरांगे यांचा लढा आमच्याविरोधात नाही तर शासनाविरोधात आहे, त्यामुळे आम्ही मध्ये जाऊन आ बेल मुझे मार करण्याची गरज काय ? ओबीसींना अनेक कामे शांतपणे करून मिळत आहेत, तर आम्ही मोर्चा कशासाठी काढू ? भुजबळांचा सवाल.

जेव्हा लढायचे तेव्हा भुजबळ राजीनामा देऊन अंबड, नगर, पंढरपूर, हिंगोली इथे फिरला होता, महामोर्चे काढले होते.  छगन भुजबळ घाबरले असे नाही, सरकार आमच्यासोबत आहे आणि आम्ही चर्चेतून मार्ग काढतो आहे,  2011 पासून जातगणनेची आमची मागणी होती त्यानुसार निर्णयही घेण्यात आला आहे, असे भुजबळांनी म्हटले.

एल निनोबद्दल बोलताना छगन भुजबळ यांनी म्हटले की, एल निनोचा मोठा प्रादुर्भाव सर्वत्र दिसत आहे. काही ठिकाणी प्रचंड पाऊस झाला आहे तर काही ठिकाणी पाऊसच नाही. पुन्हा उष्णता वाढलेली आहे, हा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आहे. जे कोणी नेते आहे ज्यांना निवडणूक लढवायची आहे, त्यांनी यावर काम केले पाहिजे. सरकारच्या सोबत काम केले पाहिजे.

अंगणवाडी कृती समितीवर बोलताना छगन भुजबळ यांनी म्हटले की, तुकाराम मुंढे चांगले काम करत आहेत. अन्न हा असा प्रकार आहे श्रीमंत गरीब त्यामुळे सर्वांकडे आवश्यक असलेल्या प्रकार आहे. स्वच्छता असणे हे त्यासाठी महत्त्वाचे आहे. तुकाराम मुंढे ज्यावर बोट ठेवतात त्यावर सगळेच मागणी करतात तशीच मागणी अंगणवाडी समितीने केली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in