• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भीषण अपघाताने राज्यात हळहळ, बापासह दोन्ही लेकींनी जागीच सोडला जीव; पत्नीही गंभीर जखमी

May 27, 2026 by admin Leave a Comment


संपूर्ण राज्याला हादरवून टाकणारी बातमी आहे. वाशिम–कनेरगाव रोडवरील देवठाणाजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. पिकअप वाहनाच्या चुकीमुळे मोटारसायकलवरून जाणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या अपघातात एक महिलाही गंभीर जखमी झाली आहे. या अपघातातील मृत देवठाणा गावातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघाताबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बापासह दोन लेकींचा मृत्यू

वाशिममधून मोठा बातमी समोर आली आहे. वाशिम–कनेरगाव रोडवरील देवठाणाजवळ भीषण अपघात झाला आहे. पिकअप वाहनाच्या चुकीमुळे मोटारसायकलवरील तिघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात बापासह दोन मुलींचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच मृत मुलींची आई गंभीर जखमी झाली आहे. मृत मुलींपैकी एक 5 वर्षांची तर दुसरी 12 वर्षांची असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ज्ञानेश्वर निवृत्ती खडसे ,किर्ती खडसे, केतकी खडसे अशी मृतांची नावे आहेत. या अपघातामुळे घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.

इचलकरंजीत विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू

रांगोळी गावातील तीन तरुणांवर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शाळेचा निकाल घेण्यासाठी बाहेरगावाहून इचलकरंजीत आलेल्या तिघांचा डंपरला धडकून अपघात झाला. या भीषण अपघातात गणेश कांबळे या युवकाचा मृत्यू झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे रांगोळी गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

विसरवाडी–नंदुरबार महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघात, दोन जण गंभीर जखमी

विसरवाडी–नंदुरबार महामार्गावरील वाढत्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांचा जीव धोक्यात आला असून अपघातांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः खांडबारा ते विसरवाडी दरम्यान रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने प्रवास करणे वाहनचालकांसाठी मोठे आव्हान बनले आहे. संबंधित विभागाकडून करण्यात आलेल्या तात्पुरत्या डागडुजीमुळे पुन्हा मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

दरम्यान, भरडू गावाजवळील धोकादायक खड्ड्यात दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने तातडीने रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी आता स्थानिक नागरिक आणि वाहन धारकांकडून केली जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Rain Update : 24, 25, 26, 27, 28 जून रोजी तुफान पाऊस, थेट अतिवृष्टीने धरणं भरणार, पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज समोर!
  • चोरून आणलेलं मनी प्लांट लावताय? होईल पश्चात्ताप, कर्जात जाल बुडून, वाचा काय होणार?
  • 2004 कॉल्स… 238 तास गप्पा… चेतनच्या प्रेमात अखंड बुडाली होती सिया.. केतन अग्रवाल हत्याकांडात तो एक धाग ठरला महत्त्वाचा
  • अखेर इराण झुकला… अमेरिकेची ती अट मान्य, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ
  • जवळ असतील हे गुण तर तिजोरी जाईल भरून, श्रीमंती घेईल पायाशी लोळण, चाणक्य नीती काय सांगते?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in