
गणेशोत्सवानिमित्त मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी मोफत बससेवेची घोषणा केली आहे. बोरिवली येथे या मोफत बस बुकिंगसाठी कोकणवासीयांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. गोविंद ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय उपाध्याय यांच्या पुढाकाराने ही बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सेवेअंतर्गत बोरिवलीतून ६७ आणि पार्ल्यातून २५ अशा एकूण ९३ बसेस कोकणासाठी सोडण्यात येणार आहेत.
याशिवाय भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीन विशेष रेल्वेचीही व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच एकूण ५५० हून अधिक बसेसची योजना आखण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवाला राजोत्सव म्हणून घोषित केल्यापासून दरवर्षी चाकरमान्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी ही सेवा दिली जात असल्याचे आमदार उपाध्याय यांनी सांगितले. मागील वर्षाचा अनुभव चांगला असल्याने यंदा मोठ्या संख्येने लोकांनी प्रतिसाद दिला असून, प्रवास सुखकर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Leave a Reply