• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बात निकली तो… बाबा रामदेव- कंगना रनौतमध्ये शिलगली, म्हणाले मला अशा लोकांवर…

August 23, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत आणि योगगुरू रामदेव यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कलगीतुरा सुरू आहे. रनौत यांनी रामदेव बाबांविषयी एक तिखट टिप्पणी केली होती. त्यावर रविवारी रामदेव बाबांनी जोरदार पलटवार केला. काही क्षुल्लक लोकांविषयी मी कोणतीच टिप्पणी करू इच्छित नाही. रामदेव बाब कोण आहेत आणि त्यांनी काय काम केले हे देशातील लोकांना माहिती आहे, असे ते म्हणाले. दोघांमध्ये चांगलेच वाकयुद्ध रंगले आहे.

असा भडकला वाद

दोघांमध्ये वार-पलटवार सुरू आहे. खासदार कंगना रनौत यांनी Gen-Z ला ‘गटर जनरेशन’ म्हटले होते. त्यावर रामदेव बाबांनी हरकत घेतली होती. मी आशा लोकांविषयी काहीच बोलू इच्छित नाही. तरुणांना जनरेशन गटर म्हणणे एक वाईट विचारांची निशाणा आहे, असा फटकारा त्यांनी लगावला होता. त्यावर माझे तारुण्य अथवा माझ्या बेडरूममधील आयुष्याविषयी काल्पनिक कथा, गोष्टी रचू नका असे रनौत म्हणाल्या होत्या.

#WATCH | Haridwar, Uttarakhand: On Kangana Ranaut’s remarks, Yog Guru Baba Ramdev says, “What can I say about these people? I do not wish to fuel a controversy. The country knows who Ramdev is and recognises his contributions. Therefore, I do not want to comment on petty… pic.twitter.com/dGvE2NUtgv

— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) August 23, 2026

रामदेव बाबांचा पुन्हा एकदा निशाणा

योगगुरू रामदेव बाबा यांनी रविवारी कंगणा रनौत यांच्या टिप्पणीबाबत प्रतिक्रिया दिली. आता या विषयावर मी काय बोलू? मी वाद वाढवू इच्छित नाही. स्वामी रामदेव काय आहे हे देश जाणतो. रामदेव बाबाचं योगदान काय आहे. हे देशाला माहिती आहे. यामुळे क्षुल्लक लोकांवर मी टिप्पणी करू इच्छित नाही. मी त्यांच्यावर टिप्पणी करून वाद वाढवू इच्छित नाही. त्यांच्या या सणसणीत टोल्यानंतर वाद संपण्याऐवजी तो वाढला आहे.

एक देश, एक निवडणूक व्हावी

चर्चेदरम्यान रामदेव बाबा यांनी एक देश, एक निवडणूक व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. वारंवार होणाऱ्या निवडणुका या देशाच्या विकास प्रक्रियेसोबत शिक्षण व्यवस्थेवरही प्रभाव टाकते. देशात वर्षभरात कुठे ना कुठे निवडणुकीची प्रक्रिया सुरूच असते. यामुळे यंत्रणेवर ताण असतो. एकदाच निवडणुका झाल्या तर विकासाला गती मिळेल आणि शिक्षण सुधारणेकडे लक्ष देण्यास वेळ मिळेल, असा युक्तीवाद त्यांनी केला.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in