
आयपीएल 2026 स्पर्धेतील 39व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा डाव अवघ्या 75 धावांवर आटोपला. या संघाने फक्त 8 धावांवर 6 गडी गमावले होते. त्यामुळे 20 धावा होतात की नाही अशी स्थिती होती. पण दिल्लीने कशीबशी 75 धावांपर्यंत मजल मारली. दिल्ली कॅपिटल्सच्या या निराशाजनक कामगिरीनंतर माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने फलंदाजांवर गंभीर आरोप केला आहे. डेल स्टेनने सांगितलं की, सध्याच्या काळात फलंदाजांना हार्ड लेंथ गोलंदाजीचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार केलं जात नाही. जोश हेझलवूड आणि भुवनेश्वर कुमारने या संधाची फायदा उचलला. हेझलवूड आणि भुवनेश्वर कुमारने पहिल्या चार षटकात सहा विकेट काढल्या आणि दिल्ली कॅपिटल्सला पूर्णपणे बॅकफूटवर ढकललं. दिल्ली कॅपिटल्स संघ 75 धावांवर ऑलआऊट झाला. तर आरसीबीने 39 चेंडूत सामना जिंकला.
आयपीएल स्पर्धेत फलंदाजांची कामगिरी पाहून डेल स्टेनने सांगितलं की, सध्याच्या काळात फलंदाजांमध्ये कुठे ना कुठे भीती आहे. कारण त्यांनी हेझलवूड, भुवनेश्वर, कागिसो रबाडा आणि जोफ्रा आर्चरसारख्या गोलंदाजांच्या लेंथ असलेल्या चेंडू अभ्यास केलेला नाही. स्टेन म्हणाला की, ‘भुवी-हेझलवूड, केजी, आर्चरचा सामना करताना फलंदाजांमध्ये भीतीचं वातावरण आहे. असं नाही की ते घाबरले आहेत, पण त्या फलंदाजांना माहिती आहे की महान गोलंदाज कुठे गोलंदाजी करणार आहेत. असं असूनही फलंदाजांना त्या लेंथसाठी तयार केलं गेलं नाही. त्यामुळे त्यांच्याकडे उत्तर नाही. ‘
Watching Buvi, Hazelwood, throw KG and Archer in there too, there’s a genuine fear from batters not because they scared, but they know exactly where these greats are going to bowl but don’t practice enough in that area to have answers.
The fear is technical skill, too deep into…— Dale Steyn (@DaleSteyn62) April 28, 2026
डेल स्टेनने पुढे सांगितलं की, स्पर्धेच्या मध्यात फलंदाजांना आपलं तंत्र बदलणं सोपं नाही. म्हणूनच गोलंदाज फलंदाजांवर हावी झाले आहेत. स्टेनने पुढे स्पष्ट केलं की, फलंदाजांसाठी हार्ड लेंथ सर्वात मोठी समस्या आहे. दिल्लीविरुद्ध भुवनेश्वर कुमारने तीन षटकात फक्त 5 धावा देऊन तीन बळी घेतली. तर जोश हेझलवूडने 12 धावात चार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
Leave a Reply