
अनेकांची एकच तक्रार असते आणि ती म्हणजे प्रचंड डोकं दुखत आहे. पण डोकेदुखीची कारणं अनेक असून शकतात. शरीरातील पाण्याची कमतरता आणिसोडियमचं असंतुलन हे महत्त्वाचं कारण असू शकतं. अशात, अनेकांकडून असा देखील दावा करण्यात येत आहे की, मीठ आणि पाण्याच्या उपायाने डोकेदुखीपासून त्वरित आराम मिळतो. सांगायचं झालं तर, मिठाचा वापर फक्त स्वयंपाक करण्यासाठी नाही तर, वेगवेगळ्या कारणांसाठी देखील केला जातो.
मीठ आणि पाण्याचा उपाय काय आहे?
सतत डोकेदुखी होत असेल कर, तुम्ही घरात एक सोपा उपाय करु शकता. या उपायात, जिभेवर चिमूटभर मीठ ठेवून काही मिनिटांनंतर एक ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. असा दावा केला जातो की, मिठातील सोडियम शरीरात पाणी टिकवून ठेवण्यास मदत करते. पण, डोकेदुखी केवळ निर्जलीकरणामुळे किंवा सोडियमच्या कमतरतेमुळेच होते असे नाही.
वेदनाशामक (Pain Killer) औषधं घेण्यापूर्वी कारण समजून घेणं महत्त्वाचं आहे: जेव्हा तुम्हाला वारंवार डोकेदुखी होते, तेव्हा स्वतःहून सतत वेदनाशामक औषधे घेण्याऐवजी त्याचे कारण शोधून काढणे महत्त्वाचं आहे. डोकेदुखी अनेक कारणांमुळे होऊ शकते, ज्यात तणाव, झोपेचा अभाव, निर्जलीकरण, मायग्रेन यांचा समावेश आहे. एवढंच नाही तर, थायरॉईडमुळे देखील अनेकांचं डोकं दुखतं. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा आहे.
उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी सावधगिरी बाळगावी… असं देखील सांगितलं जातं. मीठाचं सेवन प्रत्येकासाठी योग्य नसतं. उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना विशेषतः जास्त सोडियमचं सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे, डोकेदुखीसाठी नियमितपणे मीठ घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं अधिक सुरक्षित आहे.
मिठामुळे फक्त डोकेदुखीच नाही तर, घशाच्या दुखण्यापासूनही आराम मिळू शकतो: कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने घशातील जळजळ आणि वेदनेपासून तात्पुरता आराम मिळू शकतो. तथापि, जर घशाचं दुखणं जास्त काळ टिकून राहिलं, ताप आला किंवा लक्षणं गंभीर असतील, तर वैद्यकीय सल्ला नक्की घ्यावा. कामाच्या गडबडीत कधीच आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका…
Leave a Reply