
मुलं ही आई-वडिलांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू असतात. त्यांच्या प्रत्येक श्वासात मुलं असतात आणि पालक जिवंत असताना मुलांचा मृत्यू हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आघात मानला जातो. असाच एक हृदयद्रावक प्रसंग दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत घडला असून प्रसिद्ध अभिनेता डेनियल बालाजीच्या निधनानंतर त्याच्या आईची अवस्था अत्यंत वेदनादायक झाली आहे.
डेनियल बालाजीचे 2024 साली वयाच्या अवघ्या 48 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूने संपूर्ण चित्रपटसृष्टी तसेच त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याच्या जाण्याने केवळ एक प्रतिभावान कलाकारच नाही तर कुटुंबाचा आधारस्तंभही हरपला.
दमदार अभिनयाची ओळख
डेनियल बालाजीने आपल्या कारकिर्दीत अनेक लक्षवेधी भूमिका साकारल्या. विशेषत नकारात्मक भूमिकांमध्ये त्याने आपली वेगळी छाप पाडली होती. वेट्टैयाडू विलैयाडू, पोल्लाधवन आणि वाडा चेन्नई यांसारख्या चित्रपटांमधील त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. चित्रपट निर्मात्यांसाठी तो खलनायकाच्या भूमिकेसाठी पहिली पसंती मानले जात.
डेनियल बालाजीने आपल्या करिअरची सुरुवात टेलिव्हिजनमधून केली. कमल हासन यांच्या ‘मरुथुनायकम’ या प्रकल्पाशीही तो जोडला गेला होता. जरी हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही तरी त्यातून त्याने मोठा अनुभव मिळाला. 2002 साली एप्रिल मथाथिल या चित्रपटातून त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी त्याने प्रॉडक्शन मॅनेजर म्हणूनही काम केले होते. त्याला आध्यात्मिकतेचीही आवड होती आणि चेन्नईतील अवडी येथे त्याने एक मंदिर बांधले होते.
आईसाठी बांधलेला आलिशान बंगला
मिळालेल्या माहितीनुसार, डेनियल बालाजीने आपल्या आई राजलक्ष्मी यांच्यासाठी सुमारे 80 कोटी रुपये किमतीचा आलिशान बंगला बांधला होता. या बंगल्यात त्याची आई राहात होती. मात्र, मुलाच्या निधनानंतर या घरातील प्रत्येक कोपरा त्यांना त्याची आठवण करून देऊ लागला.
मुलाच्या आठवणींनी व्याकुळ झालेल्या त्याच्या आईने हा आलिशान बंगला सोडण्याचा निर्णय घेतला. आज त्या आपल्या मुलाने बांधलेल्या मंदिराजवळील एका छोट्या झोपडीत राहतात. हा निर्णय त्याच्या दुःखाची तीव्रता दर्शवतो. डेनियल बालाजीच्या मृत्यूनंतर त्याच्या आईची अवस्था पाहून अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत. एका यशस्वी अभिनेत्याने आईसाठी उभारलेलं आलिशान घर, आणि त्याच आईने मुलाच्या आठवणींमुळे ते घर सोडून साधं जीवन स्वीकारणं. ही कथा प्रत्येकाच्या मनाला चटका लावणारी आहे.
Leave a Reply