• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्रकाश आंबेडकरांना खुलं आव्हान, आरक्षण उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून माजी आमदाराने दंड थोपटले!

September 9, 2026 by admin Leave a Comment


सोलापुरात अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ मातंग समाजाने भव्य मोर्चा काढला आहे.
सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. राज्यभरातून मोठ्या संख्येने मातंग बांधव या मोर्चात सहभागी झाले. या मोर्चात सहभागी झालेल्या नेत्यांनी राज्य शासनावर जोरदार टीका केली. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या उपवर्गीकरणासंदर्भात निर्णय दिलेला आहे, मात्र राज्य शासन अंमलबजावणी करत नाहीये. ब्रिटिशांनी मातंग समाजाला गुन्हेगार ठरवलं होतं. आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी आम्हाला पुन्हा गुन्हेगार ठरवलं तरी हरकत नाही. पण आमच्या मागण्यासाठी लढत राहू, असा पवित्रा लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष विष्णू कसबे यांनी दिली. यावेळी एससी उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून माजी आमदार रमेश कदम आक्रमक झाले आहेत. त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना थेट आव्हान दिलंय.

आनंदराज आंबेडकर आणि बुद्धीचा काहीच संबंध नाही

मातंग समाजाला उपवर्गीकरणातील आरक्षण कसे योग्य आहे हे आम्ही सांगतो आणि ते अयोग्य कसे आहे हे प्रकाश आंबेडकरांनी आम्हाला सांगावे. आम्हाला वाद नको संवाद हवाय. आम्हाला संघर्ष नको सहकार्य हवे आहे. जर तुम्ही 4 मारण्याची भाषा कराल तर आम्ही 2 तर मारणारच, असं खुलं आव्हान रमेश कदम यांनी प्रकाश आंबेडकरांना दिले. तसेच आनंदराज आंबेडकर आणि बुद्धीचा काहीच संबंध नाही, अशी टीकाही रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांच्यावर केली.

युती सरकारने आतापर्यंत न्याय देण्याची भूमिका घेतलेली नाही

1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे, त्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. आरक्षणापासून वंचित असलेल्या समाजाकडून हा आक्रोश व्यक्त करण्यात येत आहे. गेला 75 वर्षापासून सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असलेला हा समाज रस्त्यावरती उतरून आंदोलन करीत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील आघाडी सरकार किंवा युती सरकारने आतापर्यंत न्याय देण्याची भूमिका घेतलेली नाही. देशामधील अर्धा डझन राज्यामध्ये उपवर्गीकरणाचा निर्णय झालेला आहे. परंतु आपला महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचे राज्य आहे, साधुसंतांची आणि पुरोगामी यांचा महाराष्ट्र आहे, असे म्हणत या आपल्या राज्यामध्ये उपेक्षित वंचित लोकांना न्याय देण्यासाठी इतका विलंब का होत आहे? असा सवाल रमेश कदम यांनी केला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 80s Photo Trend : 80s फोटो ट्रेंड सुपरहिट; पण फोटो बनवताना सावधान! ‘या’ चुका टाळा, नाही तर…
  • मोठी बातमी! ज्याची भीती होती तेच घडलं, इराणचा अमेरिकेला सर्वात मोठा झटका, आता ट्रम्प काय करणार? जगाचं लक्ष
  • नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज मनोज जरांगे यांच्या भेटीला, मोठ्या घडामोडी….
  • व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता…
  • Amruta Fadanvis : ते माझे भाऊ; अमृता फडणवीसांचं जरांगें पाटलांना जेवणाचं निमंत्रण

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in