
नीट पेपरफुटीमुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. आता हे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन (FAIMA) आणि युनायटेड डॉक्टर्स फ्रंट (UDF) यांनी दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने NTA आणि केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. खरच पेपर फुटला असेल तर हे खूप वेदनादायक आहे असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
कोर्टाने काय म्हटलं?
नीट पेपरफुटीसंदर्भात दाखल केलेल्या याचिकांवरील सुनावणीदरम्यान कोर्टाने NTA आणि सरकारला सुनावले आहे. खरच पेपर फटला असेल तर हे अत्यंत वेदनादायी आहे. हा केवल विद्यार्थ्यांचा नव्हे तर त्यांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीचा विषय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत अशी माहितीही कोर्टाने दिली आहे. तसेच नीट परीक्षेप्रकरणी सविस्तर आराखडा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरोग्य मंत्रालयाऐवजी शिक्षण मंत्रालयाने प्रतिज्ञापत्र द्यावे असंही न्यायालयाने म्हटलं आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply