• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर तब्बल 3 शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, मोठा गदारोळ, थेट..

July 27, 2026 by admin Leave a Comment


नीट पेपरफुटीचा मुद्दा देशभर गाजला. यादरम्यान केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने होत होती. अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन सुरू होते. शेवटी सरकारला विद्यार्थ्यांपुढे झुकावे लागले. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री पद प्रल्हाद जोशी यांच्याकडे दिले. त्यांनी या पदाचा पदभार देखील स्वीकारला. यादरम्यानच मोठी खळबळ उडाली. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि पंजाब या तीन राज्यांमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तब्बल तीन शिक्षणमंत्र्यांची पदे धोक्यात आली. हा मोठा झटका म्हणावा लागणार आहे. वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांनी डीएससी भरती परीक्षेत कथित घोटाळा झाल्याचा आरोप करत आंध्र प्रदेशचे शिक्षण मंत्री नारा लोकेश यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

नारा लोकेश यांनी आपल्यावर झालेले सर्व आरोप फेटाळून लावली. त्यांनी म्हटले की, माझ्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आणि नैतिक जबाबदारीबद्दल बोलणाऱ्यांनी अगोदर स्वत:ची पार्श्वभूमी तपासली पाहिजे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याकडे शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा मागण्याची मागणी करण्यात आली.

तेलंगणा भाजपचे अध्यक्ष एन. रामचंद्र राव यांनी म्हटले आहे की, जर राज्य सरकार विद्यार्थी शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत असलेली 12000 कोटी रुपयांची थकबाकी भरू शकत नसेल, तर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी शिक्षण खाते आपल्याकडे ठेवू नये. नीट पेपरफुटीच्या प्रकरणावर 25 जुलै रोजी हैद्राबादमध्ये मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी रॅलीवर आक्षेप घेतला होता.

दिल्लीचे कॅबिनेट मंत्री मंजिंदर सिंग सिरसा यांनी रविवारी पंजाबच्या मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली. संबंध कथित प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणावरून राजीनाम्याची मागणी करण्यात आली. आम आदमी पार्टी या मुद्द्यात दुटप्पी भूमिका घेत असल्याचा त्यांनी आरोप केला. लाखो रुपयांच्या देवाणघेवाणीनंतर फार्मसी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली आणि यामुळे विद्यार्थ्यांना मोठा फटका बसल्याचा आरोप केला जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • थलपती विजय यांच्या पत्नीने घटस्फोट मागे घेतल्यानंतर आईबद्दल मुलगा म्हणाला, ती 24 तास फक्त..
  • Rupali Chakankar : बाई एवढी माया आली कुठून, 35 कोटी रुपये..रुपाली चाकणकर यांच्या नव्या The Nines हॉटेलवर काँग्रेस नेत्याचा सवाल
  • Donald Trump: ट्रम्पची मोठी कारवाई, चार भारतीय कंपन्यांना एका झटक्यात दणका, अचानक असं का केलं?
  • सरसकट 80 ते 100 रुपयांची वाढ, कांद्यानंतर आता स्वयंपाकघरात दररोज उपयोगात येणारी वस्तुही महागली
  • भुलेश्वरचा राजा मूर्ती दुर्घटनेचं कारण पहिल्यांदाच समोर, गणपतीची मूर्ती का कोसळली? मोठा खुलासा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in