
बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय आणि सध्या राजकारणात सक्रिय असलेली अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. ती सतत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. काही दिवसांपूर्वी कंगना रणौतचे नाव केंद्रीय मंत्री चिराग पासवानशी जोडले जात होते. आता कंगानेन यावर प्रतिक्रिया देत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
कंगना रणौतने एएनआय न्यूज एजन्सी दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाल्या, “नाही, नाही, चिराग माझा एक मित्र आहेत. जेव्हा मी त्यांना पाहते, तेव्हा मला फक्त एक चांगला मित्र आठवतो. आमच्यामध्ये कोणताही रोमॅन्स सुरु नाही, मी खरे सांगते. आम्ही एकमेकांना बराच काळापासून ओळखतो…
पुढे कंगना म्हणाली, त्यांनी १० वर्षांपूर्वी माझ्यासोबत एक चित्रपट केला होता. जर तेव्हा काही रोमँटिक घडले असते… जर रोमांस झाला असता, तर आज आमची मुले देखील असती. जर मी रोमांस करायचे ठरवले असते, तर ते झाले असते. असं काहीही होत नाही. तुम्हाला माहिती आहे, फक्त एक मैत्रीची भावना आहे. जेव्हा एखादा व्यक्ती तुमच्यासारखाच वाटतो, तेव्हा असे वाटते. चिराग देखील एका अर्थाने फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित आहेत. त्यामुळे त्यांच्या आसपास मला खूप चांगले वाटते.”
कंगना आणि चिराग यांना अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिले गेले आहे. त्यामुळे लोकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले जाते आणि प्रशंसकांमध्ये चर्चा सुरू होतात. कंगना रनौत आणि चिराग पासवान 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या रोमँटिक ड्रामा चित्रपट ‘मिले ना मिले हम’मध्ये एकत्र दिसले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन तनवीर खान यांनी केले होते. या चित्रपटातून चिराग पासवान यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. कंगना रणौतने या चित्रपटात नीरू बाजवा आणि सागरिका घाटगे यांच्यासोबत मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती.
आता दोघेही आपल्या राजकीय करिअरसाठी जास्त ओळखले जातात. मात्र फिल्ममध्ये एकत्र काम केल्याच्या इतिहासामुळे सार्वजनिक कार्यक्रमांमधील त्यांच्या भेटी आजही लोकांचे लक्ष वेधून घेतात.




Leave a Reply