• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जेव्हा एक मार्ग बंद होतो..; अवघ्या 152 भागांमध्ये गुंडाळली मालिका, अमोल कोल्हेंची भावूक पोस्ट

June 5, 2026 by admin Leave a Comment


स्टार प्रवाह वाहिनीवर अवघ्या काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेली ‘मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले’ ही मालिका अचानक बंद करण्यात येत आहे. या मालिकेचा टीआरपी कमी असल्याने वाहिनीने ती बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. टीआरपीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी या वाहिनीने नुकतीच आठ नवीन मालिकांची घोषणा केली. त्याचवेळी अमोल कोल्हे आणि मधुराणी प्रभुलकर यांच्या मुख्य भूमिका असलेली ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ ही मालिका अवघ्या 152 भागांमध्ये गुंडाळली. यासंदर्भात आता अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे.

अमोल कोल्हे यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात सुरुवातीला मालिकेतील एक दृश्य पहायला मिळतंय. ‘सगळंच संपलंय सावित्री..’ असं ज्योतिराव फुले सावित्रीबाईंना म्हणतात. तेव्हा सावित्रीबाईंच्याही डोळ्यात अश्रू तरळतात. ‘जेव्हा एक मार्ग बंद होतो तेव्हा कुठेतरी नवी सुरुवात खुणावत असते. थोडंसं थांबणं आवश्यक असतं. जरा निवांत होणं गरजेचं असतं. पुन्हा नव्याने गणितं मांडण्यासाठी, नव्या जोमाने झेपावण्यासाठी,’ असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. मालिका संपतेय पण गोष्ट सुरूच राहणार, असंही अमोल कोल्हेंनी या व्हिडीओमध्ये म्हटलंय. व्हिडीओत पुढे ते गाईंसोबत निवांत वेळ घालवताना, त्यांना कुरवाळताना दिसत आहेत. अमोल कोल्हेंच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. ही मालिका बंद करू नका, अशी विनंती अनेकांनी केली आहे.

अमोल कोल्हेंचा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

‘सावित्रीबाई फुले’ मालिका म्हणजे आपल्या गौरवशाली इतिहासाचा आरसा आहे. आजच्या पिढीला याची खूप गरज आहे. ही मालिका बंद न करता पुढे चालू ठेवावी, ही नम्र विनंती,’ अशी मागणी एकाने केली. तर ‘शेवटी नेहमी सत्याचा विजय होतो. आपण करत असलेलं कार्य हे आज घरघरात गेलं आहे. साऊ जोतीचे विचार कधीच संपणार नाही, उलट ती ज्योत अजून झळकत राहील,’ असं दुसऱ्याने लिहिलं आहे. ‘समाजाला सकारात्मक विचार देणाऱ्या मालिका दुर्मिळ असतात. मी सावित्रीबाई जोतीराव फुले ही त्यापैकीच एक आहे. अशा प्रेरणादायी कथा थांबू नयेत, मालिका सुरू ठेवा,’ अशी विनंती नेटकऱ्यांनी केली आहे.

14 जून 2026 पासून ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. टीआरपीचं कारण देत अवघ्या पाच महिन्यात ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मालिकेच्या जागी ‘सुना येती घरा’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ENG vs NZ : तिसरा आणि अंतिम कसोटी सामना, कोण जिंकणार मालिका? गुरुवारपासून थरार
  • INDW vs BANW Live Streaming : भारत-बांगलादेशसाठी निर्णायक सामना, किती वाजता सुरुवात होणार?
  • आपण खरंच एकत्र आहोत का? उद्धव ठाकरेंचे महाविकास आघाडीतील नेत्यांना दोन सवाल, बैठकीत काय काय घडलं?
  • Odi Ranking : आयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारताचा दबदबा, रोहित कितव्या स्थानी?
  • Ketan Murder Case: अत्यंत धक्कादायक, धक्का देण्यापूर्वी सियाने केले ते क्रूर कृत्य… नाहीतर वाचला असता केतन? त्या जवळच्या व्यक्तीचा दावा काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in