• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जात-धर्म पाहून मुलाखत, देशात लाच घेऊनच नोकर भरती, रामदेव बाबांचा आंदोलनाचा इशारा

August 15, 2026 by admin Leave a Comment


देशात चोहोबाजूंनी हंगामा आहे. सरकारी नोकऱ्यांच्या मुलाखतीत मोठ्या प्रमाणावर गडबड होते. जात, धर्म, वर्ग, संघटनेच्या लोकांना फायदा देऊन इतरांना नोकरीपासून दूर केलं जात आहे. देशात सरकारी नोकऱ्यांमध्ये 99 टक्के घोटाळा आहे, असा खळबळजनक दावा करतानाच हे प्रकार बंद झाले पाहिजे. नाही तर मला दुसऱ्यांदा आंदोलन करावे लागेल, असा इशाराच योगगुरू बाबा रामदेव यांनी दिला आहे. जंतरमंतरवर झालेल्या जेनजी आंदोलनाच्या संदर्भाने रामदेव बाबा बोलत होते.

80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने ध्वजारोहण केल्यानंतर मीडियाशी संवाद साधताना रामदेव बाबांनी नोकर भरती प्रक्रियेवरच बोट ठेवलं. भरती प्रक्रियेत मुलाखतीच्या वेळी लाच आणि शिफारस केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. सरकारी नोकऱ्यांमध्ये 90 ते 99 टक्के घोटाळा होतो. आपल्या जात, वर्ग, धर्म, समुदाय आणि विचारांच्या लोकांना नोकरी दिली जाते. इतरांना धक्का मारला जातो. हे सर्व अपमानजनक आहे आणि लोकशाहीच्या विरोधी आहे, असं रामदेव बाबांनी म्हटलंय.

आता तरी सुधरा…

देशात चाहोबाजूने हंगामा आहे. मुलं म्हणतात शाळेत शिक्षक नाहीत. वीज नाही, पाणी नाही, शौचालये नाहीत. कुठे कॉपी होते. काही ठिकाणी पेपर फुटतो. तर कुठे सरकारी नोकऱ्यांमध्ये 99 टक्के घोटाळा होतो, असं सांगतानाच आता तरी सुधरा. नाही तर अधिक आंदोलने होतील, असा इशारा त्यांनी दिला. तसेच देशात घोटाळे अधिक आहेत, असा दावाही त्यांनी केला.

भरतीचा खेळ सुरू

एकीकडे आपण सत्यमेव जयतेची घोषणा करतो. दुसरीकडे लाखो कोटी रुपये देऊन नोकऱ्या दिल्या जात आहे. जर देशात आंदोलने सुरू राहिली तर देश कसा चालेल? आता देशात सरकारी नोकऱ्यांमध्ये 50 लाख ते एक कोटी रुपये देऊन भरतीचा खेळ सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.

अराजकतेचं समर्थन नाही

आताही वेळ गेली नाही. सुधारलं पाहिजे. नाही तर देशात आणखी आंदोलने होतील. आंदोलनाच्या नावावर अराजकतेचं आम्ही समर्थन करणार नाही. तसं सहनही करणार नाही. पण देशात घोटाळे प्रचंड आहेत हे वास्तव आहे. हे घोटाळे बंद झाले पाहिजे. नाही तर मला दुसऱ्यांदा आंदोलन करावं लागेल, असा इशारा त्यांनी दिला. आज देश द्वेष आणि घृणेचं वातावरण तयार झालं आहे. देशातील संसदेत सत्ताधारी आणि विरोधक हे पाकिस्तान आणि भारतासारखे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत, असंही ते म्हणाले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in