
आज परभणीमध्ये शिवसेनेचा शेतकरी मेळावा पार पडला, खासदार संजय जाधव यांच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. दरम्यान या मेळाव्यावरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती, त्यांनी खासदार संजय जाधव यांना इशारा देखील दिला होता. मात्र तरी देखील हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे मराठा आरक्षणासंदर्भात नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात मोठं विधान केलं आहे.
नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
मला कोणावरही टीका करायची नाही, ठरलेला कार्यक्रम ऐनवेळी रद्द करणं शक्य नव्हतं. मराठा समाजाला न्याय देण्याची सुरुवात महायुती सरकराने केली. कोणाचंही आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची आहे. मनोज जरांगे पाटलांची समाजाविषयीची तळमळ मला माहितीये. आताही आमचे मंत्री जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत आहेत, असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
Leave a Reply