
चाकणमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आता सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. चाकणमध्ये वाहतूक आणि उद्योजकांच्या समस्या दूर करण्यासाठी समिती स्थापन करणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय.
उद्योजकांच्या अपेक्षा कमीत कमी वेळात पूर्ण केल्या जाणार असंही फडणवीसांनी म्हटलंय.संपूर्ण प्लॅन तयार करायचा. रिसोर्सेस उपलब्ध आहेत. त्याचा वापर करून या ठिकाणी सगळं इन्फ्रास्ट्रक्चर डेफिसिट दूर करायचं आणि ज्या अपेक्षा उद्योजकांच्या आहेत त्या कमीत कमी वेळात पूर्ण करायच्या याकरता ही कमिटी केली आहे. केवळ चाकणच नाही तर पुण्यातल्या इतरही इंडस्ट्रियल एरियाजमध्ये ही कमिटी लक्ष घालेल आणि पुढच्या टप्प्यामध्ये इंडस्ट्रियल टाऊनशिप अॅक्टच्या अंतर्गत या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था तयार करून त्या माध्यमातून इथल्या सगळ्या सोयी निर्माण करण्याचा शासनाचा उद्देश आहे.
Leave a Reply