• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

घरी मृत्यू झाल्यानंतर कोणते अवयव दान होऊ शकतात आणि कोणते नाही? जाणून घ्या

August 21, 2026 by admin Leave a Comment


 

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर गरजू रुग्णाला नवीन जीवनदान देण्याचे अवयवदान हे एक महत्त्वाचे साधन आहे. मात्र घरी मृत्यू झाल्यानंतर अवयवदानाबद्दल अनेक लोकांमध्ये संभ्रम असतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरी सामान्य किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर सर्वच अवयवांचे प्रत्यारोपण करता येत नाही. भारतात आजही अवयवदानाबाबत मोठ्या प्रमाणात लोकांच्‍या मनात संभ्रम कायम आहे. काहींना हे आवडत नसेल, पण हे एक पाऊल एखाद्याच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकते. घरी मृत्यू झाल्यास कोणते अवयव दान करता येतात आणि कोणते नाही? हे आपण तज्ञांनी सांगितलेल्या माहितीद्वारे जाणून घेऊयात.

तज्ज्ञांच्या मते, जेव्हा रुग्णालयात एखाद्या रुग्णाला मेंदूमृत ( Brain Dead ) घोषित केले जाते, तेव्हा मृत व्यक्तीचे हृदय, फुफ्फुसे, यकृत, मूत्रपिंडे, स्वादुपिंड आणि लहान आतडे यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांचे दान करणे शक्य होऊ शकते. यासाठी वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली अवयव सुरक्षितपणे काढले जातात आणि निर्धारित वेळेत गरजू रुग्णांमध्ये त्यांचे प्रत्यारोपण केले जाते.

सामान्य मृत्यूनंतर अवयवदान करणे शक्य आहे?

घरी सामान्य किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर महत्त्वाच्या अवयवांचे दान करणे सहसा शक्य नसते. याचे कारण असे की, मृत्यूनंतर शरीराला होणारा रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो, ज्यामुळे अनेक अवयव प्रत्यारोपणासाठी अयोग्य ठरतात.

कॉर्निया दान

सामान्य मृत्यूनंतरही काही विशिष्ट परिस्थितींमध्ये कॉर्निया ( नेत्रपटल ) दान करणे शक्य होऊ शकते. दान केलेल्या कॉर्नियाचा उपयोग दृष्टी गमावलेल्या गरजू रुग्णांना पुन्हा दृष्टी मिळवून देण्यासाठी केला जाऊ शकतो.

कॉर्निया दान करण्यासाठी मृत्यूनंतर शक्य तितक्या लवकर नेत्र बँक किंवा संबंधित अधिकृत केंद्राला माहिती देणे आवश्यक असते. वेळेत माहिती मिळाल्यास वैद्यकीय तज्ज्ञ कॉर्निया सुरक्षितपणे घेऊन त्याचा योग्य रुग्णासाठी वापर करू शकतात.

काही विशिष्ट ऊतींचेही दान केले जाऊ शकते

काही परिस्थितींमध्ये‍ घरी मृत्यू झाल्यावर मृत व्यक्तीची त्वचा, हाड, स्नायूबंध (टेंडन) आणि हृदयाचे झडप यांसारख्या ऊतींचेही दान केले जाऊ शकते. मात्र हे दान पात्रता वैद्यकीय तपासणी आणि संबंधित ऊती बँकेच्या कार्यपद्धतीवर अवलंबून असते.

जर एखाद्या व्यक्तीने हयात असताना अवयवदानाची इच्छा व्यक्त केली असेल, तर मृत्यूनंतर कुटुंबाने ताबडतोब जवळच्या रुग्णालयाशी, नेत्र बँकेशी किंवा अधिकृत अवयवदान केंद्राशी संपर्क साधावा. दानासाठी वेळ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे विलंब करू नये.

अवयवदानाची प्रक्रिया वैद्यकीय तज्ञांच्या देखरेखीखाली पार पाडली जाते. अवयवदानापूर्वी डॉक्टर हे देखील तपासतात की अवयव किंवा ऊतक सुरक्षित आणि वापरण्यायोग्य आहे.

घरात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, स्वतःहून निर्णय घेण्याऐवजी तात्काळ संबंधित वैद्यकीय प्राधिकरणाशी संपर्क साधा. वेळेवर कळवल्यामुळे गरजू व्यक्तीला जीवन किंवा दृष्टीची अनमोल भेट मिळू शकते.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in