• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

घरात कॉकरोचचं काय काम? भाजपने दीपकेंच्या टीमचे आरोप फेटाळले

August 21, 2026 by admin Leave a Comment


जयपूरमध्ये कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना गावकऱ्यांनी पळवून पळवून मारले. इतकेच नाही तर सीजेपीचे नेते आशुतोष रांका यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. रांका यांनी तर हा हल्ला भाजपच्या गुंडांनीच केल्याचा आरोप केला आहे. अभिजीत दीपके यांनीही या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. आता त्यावर भाजपकडून प्रतिक्रिया आली आहे. हा हल्ला आम्ही केला नाही, असं सांगतानाच घरात कॉकरोचचं कामच काय? असा सवाल भाजपच्या आमदाराने केला आहे.

जयपूरच्या बगरू विधानसभा क्षेत्रातील रामपुरा-कंवरपुरा येथील सरकारी प्राथमिक शाळेत सीजेपीचे कार्यकर्ते पाहणी करण्यासाठी गेले होते. विद्यार्थ्यांना म्हशीच्या तबेल्यात बसवलं जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी या शाळेकडे मोर्चा वळवला. पण तिथे गेल्यावर ग्रामस्थांनी त्यांच्याशी हुज्जत घालून त्यांना मारहाण केली. तसेच पळवून पळवून मारलं. आशुतोष रांका यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. रांका यांच्या मते ग्रामस्थांनी त्यांचे कपडे फाडले. त्यानंतर या ग्रामस्थांनी सीजेपी कार्यकर्त्यांच्या विरोधात धरणं आंदोलन करून सीजेपी कार्यकर्त्यांनाच दोषी धरण्याचा प्रयत्न केला. रांका यानी हा हल्ला भाजपच्या गुंडांनी केल्याचा आरोप केला होता.

 

#WATCH | Attack on Cockroach Janta Party (CJP) team in Jaipur village | Jaipur, Rajasthan: BJP MLA Gopal Sharma says, “What is CJP? There is no use of Cockroach inside a house. Children and youth belong in a house…” pic.twitter.com/QC2Dt2qHZE

— ANI (@ANI) August 21, 2026

काँग्रेस मुखवटा घालून फिरतेय

भाजपचे आमदार गोपाल शर्मा यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. घरात कॉकरोचचं काहीच काम नाही, असं त्याने म्हटलं आहे. सीजेपी काय आहे? कॉकरोचच बदललं बोलत आहे. घरात कॉकरोचचं काहीच महत्त्व नाही. घरात मुलांचं महत्त्व आहे. घरात तरुणांना महत्त्व आहे. आमच्या इतिहासातील सर्वात मोठा जेनजी खुदीराम बोस आहेत, असं गोपाल शर्मा म्हणाले. राजस्थानचे मंत्री जवाहर सिंह बेढम यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसने सीजेपीचा मुखवटा घातला आहे आणि लोक त्यांना उत्तर देत आहेत. काँग्रेसवाले वेगवेगळे मुखवटे घालून गावात जातात आणि तिथे जाऊन शांतता भंग करतात. लोक त्यांना उत्तर देत आहेत. काँग्रेसला कोणी विचारत नाही. त्यामुळेच ते कुणाचा तरी मुखवटा घालून जातात, असं जवाहर सिंह बेढम म्हणाले.

काँग्रेसची टीका

दरम्यान काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते टीकाराम जूली यांनी या हिंसेचा निषेध नोंदवला आहे. कोणत्याही परिस्थितीत हिंसा सहन केली जाणार नाही. सरकारी शाळांची वास्तव परिस्थिती लोकांच्या समोर आली पाहिजे. सरकार शाळांची वाईट परिस्थिती लपवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप टीकाराम जूली यांनी केली आहे.

सीजेपी कार्यकर्त्यांना हुसकावलं

माहितीनुसार, सीजेपी कार्यकर्ते गावात येण्याच्या आधीच ग्रामस्तांनी गावातील मुख्य रस्त्यावर बॅरिकेड लावले होते. गावात येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी करत होते. त्यावेळी ग्रामस्थ आणि सीजेपी कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. त्यामुळे गावकऱ्यांनी सीजेपी कार्यकर्त्यांना हुसकावून लावलं. त्यानंतर ग्रामस्थांनी शाळेच्या बाहेर धरणे आंदोलन केलं आणि सीजेपीच्या विरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान, शाळेच्या दुरुस्तीसाठी सरकारने निधी दिला आहे. त्यामुळे शाळेच्या डागडुजीचं काम सुरू होणार असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in