केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वातंत्र्यदिनापूर्वी एका मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश झाल्याची माहिती दिली आहे. आयएसआय पुरस्कृत शहजाद भट्टी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले असून, या कारवाईत 200 हून अधिक दहशतवादी हस्तकांना अटक करण्यात आली आहे. ही व्यापक मोहीम देशातील चौदा राज्यांमध्ये राबवण्यात आली. या संयुक्त कारवाईदरम्यान सुरक्षा यंत्रणांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि इतर साहित्य जप्त केले आहे. यामध्ये आयडी स्फोटके, पाकिस्तानी ऑर्डनन्स फॅक्टरीचे शिक्के असलेले ग्रेनेड, पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि हेरगिरीसाठी वापरले जाणारे सीसीटीव्ही कॅमेरे यांचा समावेश आहे.
अमित शहा यांनी स्पष्ट केले की, सीमेपलीकडून चालणाऱ्या दहशतवादी कारवायांना भारताने सडेतोड उत्तर दिले आहे. हा कट उधळल्यामुळे देशाची सुरक्षा अधिक मजबूत झाली असून, स्वातंत्र्यदिनासारख्या महत्त्वाच्या प्रसंगापूर्वी संभाव्य धोके टाळण्यात यश आले आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या या घोषणेमुळे देशातील दहशतवादविरोधी प्रयत्नांना मोठे बळ मिळाले आहे.
Leave a Reply