• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

इथेनॉलमुळे साखर महागली? मोठी अपडेट काय? कृषी अर्थतज्ज्ञ काय म्हणाले?

August 25, 2026 by admin Leave a Comment


महाराष्ट्रासह संपूर्ण देशात साखरेचे भाव गगनाला भिडले आहेत. गेल्या आठवड्यात 40-50 रुपये किलो मिळणारी साखर आता 70 ते 80 रुपये किलो मिळायला लागली आहे. ऐन सणासुदीच्या काळात साखरेचे भाव प्रचंड वाढल्याने ग्राहकांमध्ये संताप पसरला आहे. साखर महागल्याने चहापासून जिलेबी, मिठाईसह सर्वच गोड पदार्थांचे भाव वाढले आहेत. त्यामुळे सामान्यांचं किचनचं बजेट कोलमडलं आहे. इथेनॉलमुळेच साखरेचे भाव वाढले असल्याचा दावा सामान्य नागरिकांकडून केला जात आहे. मात्र, खरोखरच इथेनॉल आणि साखरेच्या दरवाढीचा काही संबंध आहे का? प्रसिद्ध कृषी अर्थतज्ज्ञ विजय जावंधिया यांनी यावर भाष्य केलं असून मोठी अपडेट दिली आहे.

कृषी अर्थतज्ज्ञ विजय जावंधिया यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना साखरेच्या वाढत्या भावावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. साखरेचे भाव वाढले हे खरे आहे. पण साखरेवर सर्व नियंत्रण सरकारचंच आहे. त्यामुळे साखरेच्या वाढत्या भावाची जबाबदारीही सरकारचीच आहे, असं सांगतानाच इथेनॉलमुळे साखर महाग झाली ही चर्चा चुकीची आहे. इथेनॉलमुळे ही तेजी आली नाही. मागच्या दोन वर्षात साखरेचं उत्पादन कमी झालं आहे. उत्पादन कमी झालेलं असतानाही आपण साखरेची निर्यात सुरू ठेवली. त्याचप्रमाणे आपण इथेनॉलकडेही वळलो. त्याचा हा परिणाम असल्याचं विजय जावंधिया यांनी म्हटलंय. आपण साखरेचा बफर स्टॉक का ठेवला नाही? असा सवालही त्यांनी केला आहे.

सरकारला मॅनेज करण्यात अपयशी

साखरेवर सर्वस्वी सरकारचं नियंत्रण आहे. पण सरकारला ते मॅनेज करता आलं नाही. इथेनॉलसाठी आपण फक्त 32 टक्के ऊस वापरतो. जेव्हा पुरवठा नीट असतो तेव्हा व्यापारी नफा कमावतो. जेव्हा पुरवठ्याचा शॉर्टेज असतो तेव्हा तो होल्ड करतो. आंतराष्ट्रीय़ बाजारात सारखेची किंमत वाढली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी साखरेचे भाव वाढवले. हे सर्व गौडबंगाल आहे, असा आरोप जावंधिया यांनी केला आहे.

ब्राझिलची नक्कल भोवली

साखरेच्या तेजीचा फायदा शेतकऱ्यांना झालेला नाही. उपभोगत्यांनाही झाला नाही. सरकारने साखर आयात केली. ती कच्ची साखर आयात केली, असं सांगतानाच ब्राझिलमध्ये ऊस पावसाच्या पाण्यावर पिकतो. आपल्याकडे सिंचनाच्या पाण्यातून ऊस पिकवला जातो. तिकडे जास्त शेती आणि आणपल्याकडे कमी शेती आहे. पण आपण त्यांची नक्कल केली आणि आपली फसगत झाली, असंही त्यांनी सांगितलं.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • डोळ्यातून अश्रूच्या धारा, कोणी जोडले हात, कुणाचा संताप, आदिवासी विद्यार्थ्याची प्रकृती खालावली, सरकार हस्तक्षेप करणार?
  • CID बंद होण्यामागे अंतर्गत राजकारण? दयाचा धक्कादायक दावा; लता मंगेशकरांनी निर्मात्यांना घेतलं होतं फैलावर
  • Kangana Sharma : कास्टिंगच्या नावाखाली नको ती मागणी, अभिनेत्रीला आला हादरवणारा अनुभव
  • खूपच गोड दिसतेय.., पिवळ्या साडीमधील ही अप्सरा कोण? सौंदर्याने लावलं चाहत्यांना वेड
  • भारताने 500 धावांचा पल्ला कोणत्या संघाविरुद्ध सर्वाधिक वेळा गाठला आहे? जाणून घ्या एका क्लिकवर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in