• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आमचा अजेंडा खुर्ची नव्हे, तर…; एकनाथ शिंदेंचे विरोधकांवर टीकेचे बाण

July 26, 2026 by admin Leave a Comment


एकनाथ शिंदेंची शिवसेना पुन्हा राज्यात सक्रिय होऊ पाहत आहे. एकनाथ शिंदेंच्या पक्षाने शिवसेना आपल्या दारी हा कार्यक्रम लाँच केला आहे. या कार्यक्रमानिमित्त कोकणात एक जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या जाहीर सभेतून एकनाथ शिंदेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. तर उद्धव ठाकरे हे फेसबुक लाईव्ह करणारे नेते आहेत, अस म्हणत टीका केली. तर आमचा अजेंडा खुर्ची नव्हे, तर गोरगरीबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे हे दापोलातील कार्यक्रमात विरोधकांवर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले, ’22 ला उठाव केला, त्याची नोंद जगाने घेतली. इतिहासात अशा उठाव कधीच झाला नाही. लोकांना वाटलं, हे कोणी निवडून येणार नाही. मी त्याच सभागृहात सांगितलं होतं की, कोणी निवडून आलं नाही, तर राजकीय निवृत्ती घेईल. त्यानंतर शेती करायला जाईल. तुमच्या एकनाथ शिंदेंनी चाळीसचे साठ आमदार केले. या महाराष्ट्रातील लोकांनी स्वीकारलं. लाडक्या बहिणी, माता भगिनी, शेतकरी, वारकरी यांच्यासाठी निर्णय घेतले. अडीच वर्षात घेतलेले निर्णय ऐतिहासिक आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आली. यासाठी माता-भगिनी, शेतकऱ्यांना धन्यवाद देणे जितके कमी आहे’,

‘आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम करतो. आमचा अजेंडा खुर्ची नाही. तर आमचा अजेंडा सत्ता नव्हे, तर आमचा अजेंडा गोरगरीबांच्या जीवनात आनंद निर्माण करणे , महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणे. त्यामुळे हाच अजेंडा आम्ही राबवत आहोत. आता फक्त मुंबई नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारचा कार्यक्रम राबवू. सरकारचे लाभ अधिक आहे. पण व्यक्तीकडे दाखले, कागदपत्रे नसतात. त्यामुळे ही कागदपत्रे महत्वाचे आहेत. मी मुख्यमंत्री असताना शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राबवून लाभ दिले. मंत्रालयात न बोलवता लोकांकडे जाऊन लाभ देतो. दाखले वाटप, ट्रक्टर वाटप करतो. शिवसेना जनतेच्या दारी हा कार्यक्रम राबवत आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

‘कुणी किती कटकारस्थान केलं तरी रामदास कदम शिवसेना पुढे घेऊन जात आहेत. कुणालाही रामदास कदम यांना झुकवण्याची हिंमत नाही. रामदास कदम यांचं भाषण दसरा मेळाव्यात बघतो. एका शेर म्हणतो, हमको मिटा सके, ये ज़माने में दम नहीं. हमसे ज़माना ख़ुद है ज़माने से हम नहीं. प्रत्येक शिवसेना अशीच आहे. त्यांचा नेता रस्त्यावर उतरून लढतो. कुठलंही संकट असो. जिथे संकट तिथे शिवसेना, आम्ही फेस टु फेस वाले आहे. फेसबुक लाईव्ह वाले नाहीत. जनतेच्या मनात आदरभावना निर्माण झाली. त्यामुळे अनेक जण शिवसेनेत येत आहेत, असे पुढे म्हणाले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ऋतुजा आणि गौरवचं ब्रेकअप, एक मेल आणि MPSC चा पेपरफुटी कांड; लव्हस्टोरीमुळं सगळं उद्ध्वस्त कसं झालं?
  • साखर, डाळ, अंडी… आता चिकनचे दरही भडकणार? श्रावण संपताच…
  • Nepal Flood : पूल, गावं, घरं वाहून गेली, एक थेंब पावसाचा नसताना नेपाळमध्ये भीषण पूर आला कसा? समजून घ्या त्यामागचं कारण
  • मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट… नेमकं काय घडलं?
  • काहीही झाले तरीही सर्वात अगोदर विचारपूस करण्यासाठी मला या व्यक्तीचा फोन येतो, तुकाराम मुंढे यांचा खुलासा..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in