• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आताच निघाले होते… अचानक किंकाळ्या आणि आक्रोश… बस पलटून 17 ठार; काहीच…

April 20, 2026 by admin Leave a Comment


जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील रामनगर कघोट परिसरात एक बस पलटी झाली. प्रवाशांनी खच्चून भरलेली बस पलटी होऊन या अपघातात एकूण 17 प्रवासी ठार झाले तर 31 प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही बस रामनगरहून उधमपूरकडे जात होती. त्यावेळी हा भीषण अपघात झाला.

अधिकाऱ्याांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 10 वाजता रामनगर परिसरातील डोंगराळ परिसरात हा भीषण अपघात झाला. थोड्याच वेळा पूर्वी प्रवाशांनी भरलेली बस रामनगरहून निघाली होती. काही अंतर पुढे गेल्यावर बस पलटली. त्यामुळे प्रवाशांचा एकच आक्रोश, रडारड आणि किंकाळ्या सुरू झाल्या. शांत असलेल्या परिसरात अचानक एकच हल्लकल्लोळ माजल्याने आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. अनेक प्रवासी डोंगराच्या ढिगाऱ्याखाली अडकले गेले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर थोड्यावेळाने पोलीस आणि आपत्कालीन विभागाचे अधिकारी घटनास्थळी आले. त्यांनीही रेस्क्यू ऑपरेशन वेगाने सुरू करून प्रवाशांना बाहेर काढले.

चालकाचं नियंत्रण सुटलं आणि…

ढिगाऱ्याखालून एकूण 17 प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर 31 प्रवासी जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस उधमपूर येथील एका गावाच्या दिशेने जात होती. त्यावेळी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस पलटली. त्यामुळे झालेल्या भीषण अपघातात 17 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला.

मोदींकडून दु:ख व्यक्त

दरम्यान, या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. मोदींना मृतांच्या कुटुंबीयांसाठी आणि आणि जखमींसाठी नुकसान भरपाई देण्याची घो,णा केली आहे. जम्मू-काश्मीरच्या उधमपूर येथे बसचा अपघात झाला. या अपघातात जीवितहानी झाल्याचं ऐकून वेदना झाल्या. मृतांच्या कुटुंबीयांप्रती माझी संवेदना आहे. तसेच जखमी लवकर बरे होतील, ही प्रार्थना करतो. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांचं अर्थसहाय्य देण्यात येत आहे, असं मोदी म्हणाले.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • राज कपूर यांच्यामुळे या अभिनेत्रीचे संपले करिअर, दिलेत अनेक सुपरहिट चित्रपट, आज तिच्या दोन्ही मुली आहेत सुपरस्टार
  • Manushi Chhilar : निळाशार सागर, बिकिनीमध्ये मादक अदा, मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरच्या मालदीवमधल्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ
  • Amravati | अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, पीडित अल्पवयीन मुलीने पोलिसांना दिली संवेदनशील माहिती
  • IPL 2026 : नाव मोठं पण लक्षण…या बाबतीतही मुंबई इंडियन्स 10 टीम्समध्ये सर्वात फुस्स..
  • ‘बाई तुझा आशीर्वाद’ मालिकेतील अवनीचा खास तुलाविधी सोहळा; सुनेच्या वजनाइतके आंबे अर्पण

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in