
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून चार जखमी खेळाडूंना संधी दिली गेली आहे. या मालिकेपूर्वी त्याच्या दुखापतीत काही सुधारणा झाली नाही तर दुसऱ्या खेळाडूचा विचार केला जाईल. या भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश आहे. या मालिकेपूर्वी हे चारही खेळाडू फिट होतील की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे फिट अँड फाईन असलेल्या खेळाडूंना संधी का दिली नाही? असा प्रश्नही आहे. खरं तर कृणाल पांड्या गेल्या पाच वर्षांपासून भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याची आयपीएल स्पर्धेतील कामगिरीही चांगली राहिली आहे. पण त्याला संघात काही स्थान मिळालेलं नाही. दुसरीकडे, वॉशिंग्टन सुंदरच्या निवडीवरून वादाला फोडणी मिळाली आहे.
वॉशिंग्टन सुंदर निवड आणि कृणाल पांड्यावर अन्याय!
कृणाल पांड्या गेल्या दोन वर्षांपासून टी20 क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे. आयपीएलच्या दोन पर्वात आरसीबीच्या विजयात त्याचा मोलाचा वाटा राहिला आहे. आयपीएल 2026 स्पर्धेत त्याची अष्टपैलू कामगिरी चर्चेत राहिली. त्याने 37.66 च्या सरासरीने 266 धावा केल्या. यासह 14 विकेटही घेतल्या होत्या. असं असूनही त्याला डावललं गेलं. इतकंच काय तर वॉशिंग्टन सुंदर दुखापतग्रस्त असूनही त्याची निवड केली आहे. त्याचा बॉलिंगचा फॉर्मही काही खास नाही. त्यामुळे टीका होणं सहाजिकच आहे. पूर्ण फिट असताना निवड झाली असती तर समजू शकलो असतो. पण त्याचा निवडीचा निर्णय कोणत्या आधारावर घेतला? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे.
मागच्या सात सामन्यात सुमार कामगिरी
वॉशिंग्टन सुंदरने मागच्या सात आंतरराष्ट्रीय सामन्यात निराशाजनक कामगिरी केली आह. त्याला फक्त एकच विकेट घेण्यात यश आलं आहे. वॉशिंग्टन सुंदरला शेवटची विकेट 17 जून 2026 रोजी अफगाणिस्तानविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात मिळाली होती. तर फलंदाजीतही काही खास योगदान देऊ शकला नाही. त्याने मागच्या पाच डावात तीन वेळा एकेरी धावसंख्येवर बाद झाला. तर एकही अर्धशतक ठोकू शकलेला नाही. असं असूनही त्याची संघात निवड झाल्याने क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
Leave a Reply