• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अरुणाचलमधील चीनच्या हालचालींवर भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांचे मोठे विधान, अखेर ती गोष्ट केलीच मान्य..

August 20, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही दिवसांपासून अरुणाचल प्रदेशमध्ये चीन घुसखोरी करत असल्याचा दावा केला जात आहे. 60 किलोमीटरपर्यंत चीनने भारतात घुसखोरी केल्याचेही सांगितले जाते. त्यातच आता केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी भारत चीन सीमेवरबद्दल मोठे विधान केले. त्यांनी मान्य केले आहे की, अरुणाचल प्रदेशातील भारत तणाव आहे. त्यांनी म्हटले की, अरुणाचल प्रदेशाच्या काही गावांतील लोकांना बॉर्डरवर समस्या होत आहेत. पण त्याचे कारण आहे की, सीमेचे योग्य प्रकारे सीमांकन करण्यात आलेले नाही. हा पण त्यांनी हे देखील मान्य 60 किलोमीटरपर्यंत चीनने घुसखोरी केली हे देखील म्हणणे चुकीचे आहे. किरेन रिजिजू हे पश्चिम अरुणाचल प्रदेशच्या पश्चिम लोकसभा सीटवरून निवडून आलेत. अरुणाचल प्रदेशाच्या पश्चिममध्ये तवांग, पश्चिम कामेंग, पूर्वी कामेंग, सुबनसिरी या जिल्ह्यांता समावेश आहे. किरेन रिजिजू यांना सीमा वादावर स्पष्ट मत मांडले.

जर कोणी 60 किलोमीटरच्या घुसखोरीबद्दल बोलत असेल तर हे चुकीचे आहे. ज्यामुळे लष्कराचे मनोबल कमी होऊ शकते. भारत चीन यांच्यात अरुणाचल प्रदेशामध्ये मोठी सीमा आहे. त्याला अजून सीमांकन करण्यात आलेले नाही. तिथे सीमेवर बॉर्डर पिलर नाहीत. जमिनीवर बॉर्डर डिफाइन केलेले नाही. सीमेवर समस्या आहे, बॉर्डरजवळील आपल्या गावातील लोकांनी जी चिंता व्यक्त केली, ती अतिशय योग्य आहे.

कारण सीमा या सीमांकन करण्यात आलेल्या नाहीत. उंच ठिकाणी गाव नसते. गावखाली असते, घाटीमध्ये असते. मुळात म्हणजे भारत आणि चीन यांच्यात सीमांकन झाले नसल्याने टेन्शन असतेच. भारत आणि चीनच्या वादावर बोलताना त्यांनी म्हटले की, मान्य आहे की, सीमा भागात चीनने रस्ते बनवली आहेत. त्यांनी हायवे तयार केला, अजून काही सुविधा वाढवल्या जात आहेत.

त्यावेळी भारताने निर्णय घेतला होता की, तिथे रस्ता तयार केला जाणार नाही. काँग्रेसच्या कार्यकाळात संरक्षण मंत्री अँटोनी यांनी संसदेत हे विधान केले होते की, अरुणाचल प्रदेशाच्या सीमा भागात रस्ते तयार करणार नाही. भारत सरकारचा हा निर्णय होता. पण चीनने रस्ते तयार केले. चीनकडून बॉर्डरवर रस्ते तयार केली जात असतील किंवा अगोदर त्यांच्याकडून कब्जा केला जात असेल तर आपणही तसे करू शकतो.

पण त्याचा असा अर्थ होत नाही की, ते आपल्या गावावर कब्जा करत आहेत. आपल्या लोकांचे म्हणणे आहे की, आपली जमिन पुढेपर्यंत आहे. जे चायनिज लोक आहेत, सीमा भागातील त्यांचेही म्हणणे आहे की, आमचीही जागा पुढेपर्यंत आहे. भारत अरुणाचल प्रदेशला आपला महत्वाचा हिस्सा मानतो. भारत आणि अरुणाचल प्रदेश यांच्यात 1126 किलोमीटर सीमा आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in