• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अमिताभ यांच्या या सीनमधील 4 वाक्यांसाठी मोहम्मद रफींनी दिलेला आवाज, शब्द ऐकून आजही येते डोळ्यात पाणी

June 12, 2026 by admin Leave a Comment


हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज गायक मोहम्मद रफी यांच्या आवाजाची जादू आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. त्यांनी कारकिर्दीत असंख्य अजरामर गाणी दिली. मात्र 1978 साली प्रदर्शित झालेल्या 'मुकद्दर का सिकंदर' या सुपरहिट चित्रपटातील अवघ्या चार ओळींनी इतिहास घडवला.

या चित्रपटाचे संगीत कल्याणजी आणि आनंदजी यांनी दिले होते. चित्रपटातील बहुतांश गाणी किशोर कुमार यांनी गायली होती. मात्र चित्रपटाच्या भावनिक क्लायमॅक्ससाठी संगीतकारांना अशा आवाजाची गरज होती जो प्रेक्षकांच्या मनाला थेट भिडेल. त्यासाठी त्यांनी मोहम्मद रफी यांची निवड केली.

या चित्रपटाचे संगीत कल्याणजी आणि आनंदजी यांनी दिले होते. चित्रपटातील बहुतांश गाणी किशोर कुमार यांनी गायली होती. मात्र चित्रपटाच्या भावनिक क्लायमॅक्ससाठी संगीतकारांना अशा आवाजाची गरज होती, जो प्रेक्षकांच्या मनाला थेट भिडेल. त्यासाठी त्यांनी मोहम्मद रफी यांची निवड केली.

सुरुवातीला रफी यांनी आश्चर्य व्यक्त करत सर्व गाणी किशोर कुमार गात आहेत मग या ओळी त्यांच्याकडूनच का गाऊन घेत नाही? असा प्रश्न विचारला. त्यावर आनंदजी यांनी सांगितले की त्या चार ओळींमध्ये लागणारी वेदना आणि भावनिक खोली केवळ रफी यांच्या आवाजातूनच व्यक्त होऊ शकते.

सुरुवातीला रफी यांनी आश्चर्य व्यक्त करत, सर्व गाणी किशोर कुमार गात आहेत, मग या ओळी त्यांच्याकडूनच का गाऊन घेत नाही? असा प्रश्न विचारला. त्यावर आनंदजी यांनी सांगितले की, त्या चार ओळींमध्ये लागणारी वेदना आणि भावनिक खोली केवळ रफी यांच्या आवाजातूनच व्यक्त होऊ शकते.

यानंतर रफी यांनी कोणताही विचार न करता गाण्यास होकार दिला. विशेष म्हणजे त्यांनी या चार ओळींसाठी कोणतेही मानधन स्वीकारले नाही. त्यांनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून हे रेकॉर्डिंग विनामूल्य केले.

यानंतर रफी यांनी कोणताही विचार न करता गाण्यास होकार दिला. विशेष म्हणजे, त्यांनी या चार ओळींसाठी कोणतेही मानधन स्वीकारले नाही. त्यांनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून हे रेकॉर्डिंग विनामूल्य केले.

'जिंदगी तो बेवफा है एक दिन ठुकराएगी... मौत महबूबा है अपने साथ लेकर जाएगी...' या ओळी आजही प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करतात. अमिताभ बच्चन यांच्या व्यक्तिरेखेच्या मृत्यूच्या प्रसंगात वापरण्यात आलेल्या या गाण्याने चित्रपटाचा भावनिक प्रभाव अनेकपटींनी वाढवला.

'जिंदगी तो बेवफा है, एक दिन ठुकराएगी… मौत महबूबा है, अपने साथ लेकर जाएगी…' या ओळी आजही प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करतात. अमिताभ बच्चन यांच्या व्यक्तिरेखेच्या मृत्यूच्या प्रसंगात वापरण्यात आलेल्या या गाण्याने चित्रपटाचा भावनिक प्रभाव अनेकपटींनी वाढवला.

आजही मुकद्दर का सिकंदरचा क्लायमॅक्स आणि रफी यांच्या आवाजातील या चार ओळी ऐकताना अनेकांच्या डोळ्यात येते पाणी. त्यामुळे हे गाणं हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक हृदयस्पर्शी क्षणांपैकी एक मानले जाते.

आजही मुकद्दर का सिकंदरचा क्लायमॅक्स आणि रफी यांच्या आवाजातील या चार ओळी ऐकताना अनेकांच्या डोळ्यात येते पाणी. त्यामुळे हे गाणं हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक हृदयस्पर्शी क्षणांपैकी एक मानले जाते.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कार 8 लाखांची, पण बिल 10 लाखांचे? जाणून घ्या एक्स-शोरूम आणि ऑन-रोड किंमतींमधील खरा फरक
  • BSNLचा ‘हा’ आहे ऑल इन वन प्लॅन, दररोज 3 जीबी हाय स्पीड डेटा आणि अमर्यादित कॉलिंग
  • ENG vs NZ : तिसरा आणि अंतिम कसोटी सामना, कोण जिंकणार मालिका? गुरुवारपासून थरार
  • INDW vs BANW Live Streaming : भारत-बांगलादेशसाठी निर्णायक सामना, किती वाजता सुरुवात होणार?
  • आपण खरंच एकत्र आहोत का? उद्धव ठाकरेंचे महाविकास आघाडीतील नेत्यांना दोन सवाल, बैठकीत काय काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in