• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Weather Update : प्रतितास 100 किमी वेगानं येतंय महाभयंकर संकट; आयएमडीचा रेड अलर्ट, महाराष्ट्रालाही मोठा इशारा

May 28, 2026 by admin Leave a Comment


देशासह राज्यात सध्या तापमानानं उच्चांक गाठला आहे. अनेक भागांना तापमानाचा मोठा फटका बसत आहे. मात्र त्याचदरम्यान राज्यातील काही भागांमध्ये गेल्या तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. तर काही भागांमध्ये प्रचंड वादळीवारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पाऊस झाल्यानं मोठं नुकसान देखील झालं आहे. अनेक ठिकाणी झाडं उन्माळून पडली आहेत, तर काही ठिकाणी घरावरचे पत्रे उडून गेल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. दरम्यान आता देशात मान्सूनची एन्ट्री कधी होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच भारतीय हवामान विभाग (IMD) कडून चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पुढील 48 तासांमध्ये वातावरणात मोठा उलटफेर पहायला मिळण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांमध्ये प्रतितास 100 किलोमीटर एवढ्या प्रचंड वेगाने वादळ येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून काही भागांमध्ये रेड अलर्ट तर काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान मान्सूनबाबत देखील आयएमडीकडून मोठी अपडेट देण्यात आली आहे. मान्सून भारताच्या दिशेनं वेगानं पुढे सरकत असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये मान्सून अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि लक्षद्वीपच्या काही भागांमध्ये एन्ट्री करण्याची शक्यता आहे, अनुकूल वातावरणाची निर्मिती झाली आहे, असं आयएमडीने म्हटलं आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 48 तासांमध्ये निसर्गाचं रौद्र रूप पहायला मिळू शकतं. दिल्ली, हरियाणा आणि चंदीगढमध्ये प्रति तास 100 कीमी वेगाने वादळ येण्याची शक्यता आहे. तसेच मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, गारपीट देखील होऊ शकते. हरियासह उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार आणि झारखंड या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती?

दरम्यान राज्यातल्या काही भागांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हयांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर दुसरीकडे अजूनही विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Cancer : आहारातून हे पदार्थ आजच वगळा, कॅन्सरचा वाढवतात धोका..
  • शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा? 3 दिवस नॉट रिचेबल असणारा माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीत खळबळ
  • Ketan Agarwal Murder : एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा सर्वात मोठा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट
  • ‘त्या’ दिवशी सियाच्या प्रियकराचे इंटरनेट बंद… दिवसभर काय घडलं? केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
  • समृद्धीवर फॉर्च्युनरची ट्रकला धडक, मुंबई-गोवा मार्गावर थारचा चक्काचूर, चार विविध अपघातात एकूण पाच ठार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in