• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Surya Grahan 2026: या तारखेला लागणार या वर्षाचे दुसरे सुर्यग्रहण, भारतातून दिसणार का ?

May 29, 2026 by admin Leave a Comment


खगोल प्रेमीसाठी सुर्यग्रहणाची घटना खास मानली जाते. कारण या वेळेत आकाशात अद्भूत नजारा पाहायला मिळत असतो. तर धार्मिक लोकांसाठी सुर्यग्रहणाचे वेगळे महत्व आहे. हिंदू धर्मानुसार सुर्यग्रहणाला अशुभ मानले जाते. ते आरोग्यासाठी देखील हानिकारक मानले जाते. यामुळे सुर्यग्रहणाचा सुतक काल लागताच काही कार्ये केली जात नाहीत. या काळात कोणतेही काम करु नये जाणून घेणे महत्वाचे असते. तर पाहूयात या वर्षाचे दुसरे सुर्यग्रहण केव्हा लागणार आहे. आणि ते भारतातून दिसणार आहे की नाही.

सूर्य ग्रहण 2026 ची तारीख आणि वेळ (Solar eclipse 2026 Date)

भारतीय वेळेनुसार हे ग्रहण १२ ऑगस्टच्या रात्री लागेल. ग्रहण (Partial Phase) रात्री ९.०४ वाजता सुरु होईल आणि सकाळी ४.२५ वाजता ( १३ ऑगस्ट ) रोजी संपेल. सुर्यग्रहणाचा मुख्य अवस्था ६ मिनिटे २३ सेकंदापर्यंत राहिल. यामुळे या सुर्यग्रहणाला सर्वाधिक दीर्घ कालावधीचे ग्रहण म्हटले जात आहे.

भारतातून दिसणार का वर्षाचे दूसरे सूर्य ग्रहण

जेव्हा सुर्यग्रहण लागेल तेव्हा भारतात रात्रीची वेळ असल्याने सहाजिकच भारतातून हे ग्रहण दिसणार नाही. तसेच भारतात या ग्रहणाचा सूतक काळ मान्य असणार नाही. ज्या स्थानावर ग्रहण दिसत नाही, तेथे ग्रहणाचा सूतक काळ पाळण्याची गरज नाही. त्यामुळे १२ ऑगस्ट रोजी श्रावण अमावस्येला देवाची पूजाअर्चा, स्नान-दान आणि तर्पण आदीशी संलग्न कामे करण्यात काही अडचणी नाहीत.

सुर्यग्रहण कोठून दिसणार ?

१२ ऑगस्ट रोजी लागणारे सुर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे भारतवासियांना आकाशातील ‘रिंग ऑफ फायर’ अद्भूत दुर्लभ नजारा पाहायला मिळणार नाही.मात्र, नासाद्वारा सुर्यग्रहणाची लाईव्ह स्ट्रीमिंग युट्युब चॅनलवर पाहाता होणार आहे. तुम्ही ऑनलाईन माध्यमातून या ग्रहणाला पाहू शकतो. या वर्षाचे हे दुसरे सुर्यग्रह ग्रीनलँड, आईसलँड, स्पेन आणि आर्क्टिक्ट क्षेत्रातील देशातून दिसणार आहे.

कोणती रास आणि नक्षत्रात लागणार ग्रहण

ज्योतिष शास्रानुसार १२ ऑगस्ट २०२६ रोजी लागणारे सुर्यग्रहण कर्क रास आणि आश्लेषा नक्षत्रात लागणार आहे. ज्योतिष शास्रात ग्रहणाचा देश-जगाच्या घडामोडींवर परिणाम होऊ शकतो.

चंद्राच्या राशीत सुर्यग्रहण – कर्क राशीचा स्वामी चंद्र देव आहे. ज्याला ज्योतिष शास्रात मनाचा कारक मानला जातो. त्यामुळे ग्रहणाचा प्रभाव मुख्य रुपाने व्यक्तीच्या मानसिक स्थितीवर परिणाम टाकू शकतो.

बुध नक्षत्र- आश्लेषा नक्षत्राचा स्वामी बुध आहे. अशात या ग्रहणाने बुद्धी- व्यापार आणि संचार सारख्या क्षेत्रात मोठे बदल किंवा घडामोडी घडू शकतात.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नवीन गाड्यांमधील ‘हे’ 4 सीक्रेट फीचर्स प्रवासाला बनवतील सुरक्षित अन् सोपे; तुम्हाला माहीत आहेत का?
  • मारुती सुझुकीचा ग्राहकांना मोठा झटका! लाँचिंगनंतर पहिल्यांदाच वाढवली e-Vitara ची किंमत; पाहा किती झाली महाग
  • नवे घर खरेदी करताय? मग बजेटमध्ये ‘या’ अतिरिक्त शुल्कांचा नक्की समावेश करा, नाहीतर होईल आर्थिक कोंडी
  • प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न
  • चीन-पाकिस्तानला धडकी भरवणारी बातमी, अवघ्या 90 सेकंदात होणार खात्मा; भारताची मोठी योजना काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in